India-Canada Tensions: कॅनडाने ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावले माघारी, भारताने दिला होता देश सोडण्याचा आदेश

नवी दिल्ली: कॅनडाने(canada) भारतातील आपल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे. खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्यााचा आरोप भारतावर केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरूवारी अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याबाबतची माहिती दिली. त्यांनी हे ही म्हटले की कॅनडा प्रत्युत्तर कारवाई करणार नाही.


खरंतर, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या प्रत्युत्तर कारवाईचा अर्थ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनाही देश सोडण्याच्या आदेशाबद्दल आहे. परराष्ट्र मंत्री जोली यांनी सांगितले भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांचे राजनैतिक पद्द रद्द केले जाईल.



भारताच्या अधिकाऱ्यांना देश सोडण्यास नाही सांगणार कॅनडा


परराष्ट्र मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, भारताच्या कारवाईमुळे आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता आम्ही त्यांना भारतातून बोलावले आहे. जर आम्ही राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बनवलेले नियम तोडतो तर जगात कोणतेच राजनैतिक अधिकारी सुरक्षित राहणार आहे. यामुळे आम्ही भारताच्या या कारवाईवर कोणत्याही प्रकारचा प्रतिक्रिया देणार नाही. ज्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांनी भारत सोडला आहे. त्यांच्यासोबत ४२ असे लोक आहे जे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत.



भारत-कॅनडा यांच्यातील वादाचे कारण


खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी जूनमध्ये सर्रे शहरातील एका गुरूद्वारात हत्या करण्यात आली. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खालिस्तानी समर्तकांनी कॅनडा सरकारव दबाव आणण्यास सुरूवात केली. त्यांचे म्हणणे होते की या हत्येमागे भारताचा हात आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत येत निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला. तसेच ओटावामधील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले.


भारताने ट्रुडो यांचे हे दावे फेटाळून लावले होते. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. कॅनडाच्या अनेक राजनैतिक अधिकाऱ्यांना त्यांनी देश सोडण्याचे आदेश दिले. यानंतरच भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढण्यास सुरूवात झाली. यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बातमी आली की भारताने नवी दिल्लीतील कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले. भारतात कॅनडाचे एकूण मिळून ६२ राजनैतिक अधिकारी आहेत.

Comments
Add Comment

Sikkim Landslide : सिक्कीमच्या जलविद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना; बोगदा कोसळून २० जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

सिक्कीम : सिक्कीम (Sikkim) मधील नामची (Namchi) जिल्ह्यात एनएचपीसी (NHPC) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पातील (Hydroelectric Project)

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा