Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आत्महत्या

  164

वांद्रे पूर्व उड्डाणपुलावर गळफास लावून तरुणाने संपवले जीवन


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला दिलेल्या मुदतीची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. त्यामुळे आरक्षणाविषयी काही चिन्हे दिसत आहेत की नाहीत, या बाबीवर मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठला आहे. या आंदोलनात पुढाकार असलेले आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी राज्यभर सभांचा सपाटा लावला आहे आणि त्यांच्या सभांना भरघोस प्रतिसादही मिळत आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी आग्रही असणार्‍या ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने आत्मह्त्या केल्याने खळबळ उडाली आहे.


सुनील कावळे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. हा तरुण मुळचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते