मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला दिलेल्या मुदतीची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. त्यामुळे आरक्षणाविषयी काही चिन्हे दिसत आहेत की नाहीत, या बाबीवर मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठला आहे. या आंदोलनात पुढाकार असलेले आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी राज्यभर सभांचा सपाटा लावला आहे आणि त्यांच्या सभांना भरघोस प्रतिसादही मिळत आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी आग्रही असणार्या ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने आत्मह्त्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सुनील कावळे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. हा तरुण मुळचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…