Toll naka Scam : राज्य सरकारचे कॅमेरे लागले आता दोन दिवसांत आमचेही लागतील

टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन मनसेचा इशारा


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलच्या झोलची (Toll scam) जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जातो या विधानाला विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची टोल प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भेट घेतली आणि सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यात आला. टोल आकारणीबाबत अनेक सकारात्मक निर्णय यावेळेस घेण्यात आले.


टोलनाक्यांवरुन दिवसभरात किती वाहनांची ये-जा होते यावर सरकारच्या कॅमेर्‍यांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे, असाही एक निर्णय घेण्यात आला. पण यासोबतच मनसेही आपल्या कॅमेर्‍यांद्वारे या गाड्यांवर लक्ष ठेवेल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला. राज्य सरकारने राज्यातील मुख्य टोलनाक्यांवर काल रात्री कॅमेरे लावले आहेत. तर आता पुढच्या दोन ते तीन दिवसांत मनसेचेही कॅमेरे लागतील, त्याच्यानंतर टोल नाक्यांवरील गाड्या मोजायचं काम अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होईल, असं मनसेतर्फे सांगण्यात आलं आहे.


राज्य सरकार टोल घेणार असेल तर लोकांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होतेय का हे पाहण्यासाटी मनसेकडून टोल नाक्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्या माध्यमातून टोल नाक्यावरून किती गाड्या जातात हे कळेल. तसेच टोलनाक्यांवर लावलेल्या कॅमेर्‍यांचं कंट्रोल मंत्रालयात असणार आहे, त्यामुळे तिथे लोकांना काय त्रास होतोय ते कळेल. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त