Toll naka Scam : राज्य सरकारचे कॅमेरे लागले आता दोन दिवसांत आमचेही लागतील

  116

टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन मनसेचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलच्या झोलची (Toll scam) जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जातो या विधानाला विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची टोल प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भेट घेतली आणि सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यात आला. टोल आकारणीबाबत अनेक सकारात्मक निर्णय यावेळेस घेण्यात आले.

टोलनाक्यांवरुन दिवसभरात किती वाहनांची ये-जा होते यावर सरकारच्या कॅमेर्‍यांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे, असाही एक निर्णय घेण्यात आला. पण यासोबतच मनसेही आपल्या कॅमेर्‍यांद्वारे या गाड्यांवर लक्ष ठेवेल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला. राज्य सरकारने राज्यातील मुख्य टोलनाक्यांवर काल रात्री कॅमेरे लावले आहेत. तर आता पुढच्या दोन ते तीन दिवसांत मनसेचेही कॅमेरे लागतील, त्याच्यानंतर टोल नाक्यांवरील गाड्या मोजायचं काम अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होईल, असं मनसेतर्फे सांगण्यात आलं आहे.

राज्य सरकार टोल घेणार असेल तर लोकांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होतेय का हे पाहण्यासाटी मनसेकडून टोल नाक्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्या माध्यमातून टोल नाक्यावरून किती गाड्या जातात हे कळेल. तसेच टोलनाक्यांवर लावलेल्या कॅमेर्‍यांचं कंट्रोल मंत्रालयात असणार आहे, त्यामुळे तिथे लोकांना काय त्रास होतोय ते कळेल. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही