Sakal Maratha Samaj : सकल मराठा समाजासाठी कुठे समाधान तर कुठे वेदना!

एकीकडे कुरेटिव्ह पिटीशन सुनावणीस सर्वोच्च न्यायालय राजी, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या सभेत उष्माघाताने तरुणाचा मृत्यू


नाशिक : सकल मराठा समाजासाठी रविवारचा दिवस एका बाजूला समाधानाची तर दुसऱ्या बाजूला वेदना देणारी बातमी घेऊन उजाडला. समाधानाची बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कुरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही पिटीशन दाखल करून घेत सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. या बातमीनंतर सकल मराठा समाजातून समाधान व्यक्त केले जात असतानाच मराठा समाजाचा एक तरुण मृत झाल्याची बातमी येऊन धडकल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.


अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या ३६ वर्षीय मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही बातमी आहे. विलास पवार वय ३६ रा.गेवराई, जि. बीड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विलास पवार यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आले नसले तरी त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा असा अंदाज आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 'सहासूत्री' कार्यक्रम; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण नागपूर : राज्यात सुरू

तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी

मुंबईत फुटबॉल स्टार मेस्सी येणार, वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

मुंबई : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. शनिवारी मेस्सी कोलकाता येथे होता.

नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावणार, तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती

गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शरण या नाही तर मरा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमित

मुंबईत रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन'; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर : मुंबईतील जमिनींवर भूमाफियांच्या मदतीने रोहिंग्या मुसलमानांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि बांधकामे वाढत

“राष्ट्रप्रेम, सेवा आणि संघटनशक्तीचा संगम म्हणजे रेशीमबाग”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी दिली नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ