प्रहार    

Child Marriage : महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने बालविवाह मुक्त भारत अभियान

  376

Child Marriage : महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने बालविवाह मुक्त भारत अभियान

पेण : पेण येथील महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून 'बालविवाह मुक्त भारत' अभियान रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत मुलांचे संरक्षण, मुलांविरुद्ध हिंसा आणि शोषणमुक्त जग, मुक्त मुले, सुरक्षित बालकांच्या सुरक्षेकरिता संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या मोहिमेत दरवर्षी १५ लाख मुलींना बालविवाहापासून वाचवण्याचे उद्दिष्ट असून २०२३० पर्यंत बालविवाह मुक्त भारत करण्याचा मनोदय संस्थेचे अध्यक्ष मनोज गावंड यांनी यावेळी बोलून दाखविला. बालविवाह रोखण्याकरता महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट ही नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन सोबत काम करत आहे.

बालविवाह ही एक मोठी सामाजिक समस्या आहे, जी मुलांचे हक्क आणि त्यांचे बालपण हिरावून घेते. २०१९-२० मध्ये केलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, २० ते २४ वर्षे वयोगटातील एकूण २३.३३ टक्के मुलींचे कायदेशीर वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न झाले आहे. ही गंभीर बाब असून त्यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. सरकारने बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ लागू केला आहे, जो बालविवाहापासून मुलांना संरक्षण प्रदान करतो. बालविवाहाचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना या दुष्प्रवृत्तीबद्दल संवेदनशील बनवण्याची गरज आहे, असे मत मनोज गांवड यांनी व्यक्त केले.

कैलाश सत्यार्थी यांनी बालविवाह बंद करण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत देशातील ७,५८८ गावांतील ७६,००० धाडसी महिलांनी समाजाला बालविवाहमुक्त करण्याची शपथ घेऊन मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये १४ राज्य सरकार सामील झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनांना अधिसूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यन्त या मोहिमेत सुमारे १ कोटी ५० लाख नागरीकांनी सहभाग घेतला आहे.

रायगड जिल्ह्यांतील पेण, अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, तळा, पनवेल, माणगांव, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, सुधागडसह रत्नागिरी जिल्यांतील दापोली, मंडणगड, खेड, चिपळून, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, व राजापूर तालुक्यांत बाल विवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत तालुक्यासह जिल्ह्यांतील नागरीकांना बाल विवाह विरोधातील कायद्या संदर्भात माहिती देण्यात येत आहे. तसेच नागरीकांना बालविवाहा विरुद्ध शपथ देण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment

रत्नागिरी : एसटी डेपोतच डिझेल चोरी, टँकरमध्ये छुपा कप्पा बनवून डिझेल चोरी

मंडणगडमध्ये एसटी डेपोतच डिझेल चोरीचा प्रकार समोर आला आहे. एसटी बससाठी डिझेल घेऊन आलेल्या टँकरमधूनच डिझेल चोरी

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

रत्नागिरी : लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या, राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार - नितेश राणे

रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव्ह

कोकणात राष्ट्रवादीला धक्का प्रशांत यादव भाजपमध्ये करणार प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुषखबर;मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कार्यवाहीचे आदेश

मुंबई : मुंबई-गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका