Operation Ajay: इस्त्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने सुरू केले 'ऑपरेशन अजय'

नवी दिल्ली: इस्त्रायलवर(israel) दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यानंतर बुधवारी पाचव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. यातच भारताने इस्त्रायलमधील भारतीयांच्या परतण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्याची घोषणा केली आहे.


परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, इस्त्रायमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन अजय लाँच करत आहे. स्पेशल चार्टर फ्लाईट आणि इतर प्रकारची व्यवस्था केली जात आहे. परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि चांगल्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रतिबद्ध आहोत.


 


एस जयशंकर यांच्या पोस्टवर इस्त्रायलमध्ये भारतीय दूतावासाने म्हटले की ज्या भारतीय नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना उद्या गुरूवारी स्पेशल फ्लाईटसाठी मेल केले आहे. त्यानंतर उड्डाणासाठी इतर नागरिकांना मेसेज पाठवले जातील. न्यूज एजन्सी पीटीआयने मुंबईत इस्त्रायलच्या महावाणिज्य दूत कोबी शोशानी यांच्या हवाल्याने सांगितले की इस्त्रायलमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय आहेत.


शनिवारी सकाळी हमासने इस्त्रायल देशावर रॉकेट हल्ला केला होता. या दरम्यान हमासने घुसखोरी केली तसेच सामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर ठेवले होते. यानंतर इस्त्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. इस्त्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. तर हमासही इस्त्रायलच्या दिशेने रॉकेट सोडत आहे

Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या