Operation Ajay: इस्त्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने सुरू केले 'ऑपरेशन अजय'

नवी दिल्ली: इस्त्रायलवर(israel) दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यानंतर बुधवारी पाचव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. यातच भारताने इस्त्रायलमधील भारतीयांच्या परतण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्याची घोषणा केली आहे.


परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, इस्त्रायमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन अजय लाँच करत आहे. स्पेशल चार्टर फ्लाईट आणि इतर प्रकारची व्यवस्था केली जात आहे. परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि चांगल्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रतिबद्ध आहोत.


 


एस जयशंकर यांच्या पोस्टवर इस्त्रायलमध्ये भारतीय दूतावासाने म्हटले की ज्या भारतीय नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना उद्या गुरूवारी स्पेशल फ्लाईटसाठी मेल केले आहे. त्यानंतर उड्डाणासाठी इतर नागरिकांना मेसेज पाठवले जातील. न्यूज एजन्सी पीटीआयने मुंबईत इस्त्रायलच्या महावाणिज्य दूत कोबी शोशानी यांच्या हवाल्याने सांगितले की इस्त्रायलमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय आहेत.


शनिवारी सकाळी हमासने इस्त्रायल देशावर रॉकेट हल्ला केला होता. या दरम्यान हमासने घुसखोरी केली तसेच सामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर ठेवले होते. यानंतर इस्त्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. इस्त्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. तर हमासही इस्त्रायलच्या दिशेने रॉकेट सोडत आहे

Comments
Add Comment

'टायटॅनिक पोज' आणि 'उभं राहून बाईक' चालवणं पडलं महागात! मानसी पारेख आणि टिकू तल्सानियावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल

अहमदाबाद : अभिनेत्री मानसी पारेख (Manasi Parekh) आणि ज्येष्ठ अभिनेते टिकू तल्सानिया (Tiku Talsania) यांच्यावर अहमदाबादच्या

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय