Kanjurmarg Dumping ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी विक्रोळीत शिवसेनेचे आंदोलन

दुर्गंधीने नागरिक त्रस्त


ठाणे : गेल्या काही वर्षांपासून मुंबई कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंड मधून येणार्‍या दुर्गंधीसंदर्भात (Kanjurmarg Dumping ground) स्थानिकांनी वारंवार आंदोलनाची मागणी केली होती. मात्र, अजूनही त्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. मुंबई उपनगरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. शिवसेनेचे नेते अनिल पांगारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.


आंदोलकांनी डम्पिंग ग्राऊंडच्या समोर असलेला रस्ता म्हणजेच पूर्व द्रुतगती मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ठाण्याची सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनिल पांगारे म्हणाले की, या मार्गावर कितीतरी दुर्गंधी येत आहे. गेली कित्येक वर्षे इथे राहणारे लोक ही दुर्गंधी सहन करत आहेत. आजारांना सामोरे जात आहेत. आमचं सरकार हे गोरगरिबांचं आहे, त्यामुळे त्यांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणून हा रास्ता रोको आणि आंदोलन आम्ही करत आहोत. यामुळे इथे अडवण्यात आलेल्या लोकांनाही कळेल की थोडा वेळ थांबलं तरी किती दुर्गंधी सहन करावी लागते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


आंदोलकांची ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून आठ ते दहा दिवसांत प्रश्न सोडवला गेला पाहिजे अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात मात्र अजूनही कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आंदोलनाची दखल घेऊन आठ ते दहा दिवसांत हा प्रश्न सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात ॲमेझॉनसाठी गुंतवणुकीच्या व्यापक संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांची मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट मुंबई, दि. २४ : डेटा सेंटर

Padma Awards 2026: पद्म पुरस्कारांनी गौरवला महाराष्ट्र; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववानांचा सन्मान

महाराष्ट्रातील मान्यवरांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; पद्म पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, दि. २४ : देशातील सर्वोच्च

Ashadhi Wari : आषाढी वारीत भाविकांच्या सुविधांना प्राधान्य; कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज • आषाढी वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक तयारी • डिस्कव्हरी व

Child mortality : बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्राचा 'मास्टर प्लॅन'; आरोग्य, आदिवासी आणि महिला-बालविकास विभाग एकत्र येणार!

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधान परिषदेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील बालमृत्यूचे प्रमाण आणखी कमी

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या