Maharashtra Monsoon: राज्यात या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

  147

मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा(monsoon) जोर वाढला आहे.राज्याच्या अनेक भागांमध्ये दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.


हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिण कोकण, गोवा येथे पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.


दरम्यान यावेळेस पावसासोबत वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. त्यामुळे येथे वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट व्यक्त केला आहे.



मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस


मुंबईतही हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊश कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो.



परतीचा पाऊस


राज्यात ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरदरम्यान मान्सून परतणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी