मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा(monsoon) जोर वाढला आहे.राज्याच्या अनेक भागांमध्ये दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिण कोकण, गोवा येथे पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान यावेळेस पावसासोबत वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. त्यामुळे येथे वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट व्यक्त केला आहे.
मुंबईतही हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊश कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो.
राज्यात ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरदरम्यान मान्सून परतणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून…
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) यांनी तंबाखू (tobacco) वापरकर्त्यांसाठी…
९ विद्यार्थी जखमी रायगड : आज सकाळी कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) हातकणंगले येथे सोलापूरहून कणकवलीला जाणाऱ्या…
नेमकं काय घडलं होतं तेव्हा? पुणे : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) ड्रग्जमाफिया ललित पाटील…
दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… संजय राऊतांना बाळासाहेब ठाकरेंना पण भोंदूबाबा म्हणायचंय का? आमदार नितेश…
'माझ्या एरियात राहायचे नाही,असे म्हणत माचिसची पेटलेली काडी अंगावर फेकली अन्... संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद…