Nitesh Rane : मराठी माणसाच्या भविष्याचा खून करून स्वतःच्या अंगावर बरबटलेलं रक्त आधी पुसा...

नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार


मुंबई : मुंबईतील मुलुंडसारख्या ठिकाणी केवळ मराठी असल्यामुळे तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) यांना ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली ही बाब आता सर्वच राजकीय पक्षांनी (Political Parties) उचलून धरली आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी या घटनेला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जबाबदार धरत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील त्यांच्यावर पलटवार केला आहे.


नितेश राणे म्हणाले, मुलुंड घटनेला जबाबदार भाजप आणि शिंदे आहेत असं बोलण्याअगोदर संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. मुंबईतला मराठी माणसाचा टक्का का घसरला? इतकी वर्षे महापालिकेत उद्धव ठाकरे यांची सत्ता होती ना? मग तरीही मुंबईतला मराठी माणूस आज मीरा रोड, वसई, विरार, भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी का राहायला गेला? मुंबईमध्ये त्यांना का घर घ्यावंसं वाटलं नाही? का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही? का वडापावच्या गाडी पुरतं ठेवलं? असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला.


पुढे नितेश राणे म्हणाले, पत्राचाळमध्ये काय मराठी माणसं राहत नव्हती? खंबाटा आणि एअर इंडियामध्ये मराठी कामगार काम करत नव्हते का? मग त्याला जबाबदार कोण आहे? स्वतःच्या अंगावर मराठी माणसाच्या भविष्याचा खून करून बरबटलेलं जे रक्त आहे ते आधी पुसा आणि मग भाजप आणि शिंदे साहेबांवर बोट ठेवा, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Python Snake : अंधेरीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे पाळला होता अजगर! वनविभागाच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे अजगर पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर