Pune Manache ganpati : पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे झाले विसर्जन

पुणे : पुण्यात सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरुच असल्या तरी पाच मानाच्या गणपतींचे वेळेत विसर्जन पार पडले आहे. कसब्याचा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती. तर तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मानाच्या गणपतींचे गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत विसर्जन करण्यात आले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम होऊ न देता गणरायाच्या भक्तीत लीन होत पुणेकरांनी बाप्पाला निरोप दिला.

कसबा गणपती 




 



 

सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. दुपारी ४:३५ वाजता विसर्जन झाले.

 

तांबडी जोगेश्वरी गणपती




मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ५:१० वाजता विसर्जन झाले.

गुरुजी तालीम गणपती




 



मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक दुपारी १२ वाजता सुरू झाली आणि सायंकाळी ५:५५ वाजता विसर्जन झाले.

तुळशीबाग गणपती




मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक दुपारी १ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ६:३२ वाजता विसर्जन झाले.

केसरीवाडा गणपती




मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक दुपारी २:१५ सुरू झाली, तर सायंकाळी ६:४५ वाजता विसर्जन झाले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

'आरएसएस' कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरून मोठा सस्पेन्स!

ते पत्र खोटं! सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार! राजेंद्र गवईंचा खुलासा अमरावती: देशाचे

पावसाचे कारण सांगून गैरहजर रहाणा-या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!

मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये

Maharashtra Rain Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट', राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये मोठा धोका, घराबाहेर पडणे टाळाच!

राज्यात पूरस्थिती गंभीर : मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा मुंबई : राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असून,

Rain Update : ठाणे जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट; प्रशासन सज्ज, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' (Red Alert)

मुख्यमंत्र्यांनी पोलखोल करताच संजय राऊतांची जीभ घसरली, वाहिली शिव्यांची लाखोली; पहा नेमकं काय झालं?

भोXXXX सरकार कोणाचं आहे? हXXXX लोक आहेत, संजय राऊतांची जीभ घसरली मुंबई : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र