NIA : ६ राज्ये, ५१ ठिकाणांवर एनआयएचा छापा, खालिस्तानी-गँगस्टरवर मोठी कारवाई

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास विभागाने(national investigation agency)  गँगस्टर आणि खालिस्तानी संघटनेविरोधात मोठी कारवाई केली आहे. तपास विभागाने पंजाब, हरयाणा, राजस्थान, दिल्ली एनसीआर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील साधारण ५१ ठिकाणांवर एनआयएने छापेमारी केली. एनआयएकडून दहशतवादी, गँगस्टर आणि ड्र्रग्स डीलर्स यांच्यातील संबंधित ३ केसमध्ये ही कारवाई करण्यात आली.


सर्वाधिक पंजाबमध्ये ३० ठिकाणी एनआयएच्या टीमने छापा टाकला. तर राजस्थानात १३, हरयाणामध्ये ४ आणि उत्तराखंडमध्ये २, दिल्ली एनसीआर आणि यूपीमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली.



तीन गँग एनआयएच्या निशाण्यावर


एनआयएने ज्या ५१ ठिकाणी छापेमारी केली ते लॉरेन्स बिश्नोई, बंबिहा गँग आणि अर्श डल्ला गिरोहच्या सदस्यांशी संबंधित आहे. दिल्लीमध्ये भीमा थाना रोडीमध्ये एनआयएची टीम पोहोचली. येथे यादविंदर उर्फ जशनप्रीतच्या घरावर छापा टाकण्यात आला. यदविंदरच्या खात्यामध्ये परदेशातून फंडिंग झाले आहे.


गेल्या काही महिन्यांमध्ये देश तसेच परदेशात खालिस्तानी कारवाईला वेग आल्याचे दिसून येत आहे. पंजाब तसेच हरयाणामध्ये खालिस्तानी दहशतवादी अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे खालिस्तानी दहशतवादी बऱ्याच कारवायांसाठी गँगस्टर्सची मदत घेत होती अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागली आहे.

Comments
Add Comment

योगी सरकारची उत्तर प्रदेशातील १.८६ कोटी महिलांना 'ही' दिवाळी भेट!

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील १.८६ कोटी माता-भगिनींना

गुगलची भारतात $१५ अब्ज गुंतवणूक; विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले गिगावॅट-स्केल एआय हब उभारणार

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठत, गुगलने भारतात आपल्या

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड

कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द

तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत,