गौरी-गणपतींचे उत्साहात विसर्जन

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी भावनिक साद घालीत गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. माहेरवाशीण गौरींसह गणपतींचे गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजरात शनिवारी विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, या जयघोषांसह गणपती व गौरीला भावपूर्ण वातावरणात निरोप देत विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी विधिवत पूजा, आरती करून भक्ती भावाने गणरायाला निरोप देण्यात आला.


बाप्पांसाठी सर्वत्र फुलांचा वर्षाव होत असताना वरुणराजानेही हजेरी लावल्याने विसर्जन मिरवणुकीला आणखी रंग चढला होता. गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, मढ-मार्वे आदी ७२ विजर्सन स्थळांसह २६ कृत्रिम तलावात गणरायांचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले.


अनेक ठिकाणी गणपती बाप्पा, गौराईंसोबत सेल्फी काढून घेताना गणेशभक्त दिसत होते. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी चौपाट्यांवर भक्तांची मांदियाळी होती. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते, चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलीस, स्वयंसेवक, महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सज्ज आहेत. चौपाट्यांवर उभारण्यात आलेल्या टेहळणी मनो-यांवरून आणि ठिकठिकाणी समाजसेवी संस्थांनी उभारलेल्या स्वागत कक्षांमधून स्पिकरद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येत होत्या.


किनारपट्टी परिसरात कोणतीही अपरिचित घटना घडू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. पावसाने सायंकाळी पाचच्या दरम्यान काहीसा जोर धरून गणरायांसह गौराईंना निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती. संध्याकाळी ६ नंतर दादर आणि गिरगाव चौपाट्यांवर गणेशभक्तांची गर्दी वाढली.


ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यातील गौरी-गणपतींचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. पाचही जिल्ह्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. तर अग्निशमन दल, आपत्कालीन पथक, शहर पालिका, नगर पालिका आणि पंचायत समिती मार्फत गणेश विसर्जनासाठी चोख तयारी केली होती.

Comments
Add Comment

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि