शेती करणे झाले कठीण! वाढती मजुरी आणि महागड्या खतांमुळे शेतकरी त्रस्त!

नवी दिल्ली :  पावसाचे वेळापत्रक बदलल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. गरज असते तेव्हा पडत नाही आणि नको तेव्हा मुसळधार कोसळून शेती पिकांची नासाडी करतो. एकिकडे शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्चात दुप्पट वाढ झाल्याने, वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मजुरी असो वा डिझेलचा खर्च किंवा शेतात लागणारे खत, बी बियाणे, प्रत्येकाचे भाव वाढले आहेत. केवळ शेतीच नाही तर कुटुंब चालवण्यासाठी लागणा-या दैनंदिन वस्तूही महाग झाल्या आहेत. अशा स्थितीत उत्पन्न दुप्पट करण्याचा लाभ शेतक-यांना कसा मिळणार, हा मोठा प्रश्न आहे.


जर्मनीची कृषी आधारित कंपनी बायर क्रॉप सायन्सने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील २ हजार ५६ शेतक-यांचा समावेश केला आहे. या सर्वेक्षणानुसार, देशातील ५५ टक्के लहान शेतक-यांनी मान्य केले की, गेल्या काही काळात देशात अन्नधान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच मजुरीचा खर्चही वाढला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शेती करणे कठीण झाले आहे.


बायरच्या या सर्वेक्षणात, ६० टक्के शेतक-यांनी सांगितले की, भारतात डिजिटल तंत्रज्ञान वाढल्याने शेती करणे सोपे झाले आहे. शेतक-यांच्या मते, भारतात वाढत्या डिजिटलायझेशनमुळे पीक सुरक्षा सुधारण्यास मदत झाली आहे.


यासोबतच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी ८ शेतक-यांनी त्यांच्या शेतीशी संबंधित भविष्याबाबत आशावादी असल्याचे सांगितले आहे.


या सर्वेक्षणात ४७ टक्के शेतक-यांनी मान्य केले की महागड्या वीजेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. ३७ टक्के शेतकर्‍यांनी शेतीतील उत्पन्न अस्थिर आहे असे सांगितले आहे. तर ३६ टक्के शेतकर्‍यांनी पीक सुरक्षा हे मोठे आव्हान आहे, असे सांगितले.


यासोबतच या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या ४२ टक्के शेतक-यांनी मान्सूनमध्ये कमी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा पीक उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर