१७ हजार महिलांच्या बँक खात्यात २४ कोटींचा निधी जमा

महिलांना भरघोस आर्थिक मदत करणारी राज्यातील पहिली महापालिका


ठाणे शहरातील गरीब, गरजू तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत दिली जात असून तब्बल १७ हजार महिलांच्या बँक खात्यात २४ कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे. कचरावेचक महिला, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या महिला, कर्त्या पुरुषाचे तसेच पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन तसेच ६० वर्षीय महिलांच्या उदरनिर्वाहासाठी हा निधी महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून दिला जातो.


ठाणे महापालिकेच्या वतीने सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण योजनेकरीता तरतूद करण्यात आली होती. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने महिलांच्या योजनेमधील निधी वाटपासाठी सहा महिने उशीर झाला होता. पालिकेच्या महासभा ठरावानुसार फक्त ८,२७३ महिलांना आर्थिक लाभ मिळणार होता. मात्र सरसकट महिलांना लाभ देण्याचा निर्णय झाल्यानंतर १७,५२१ महिलांना विविध चार योजनेत पात्र करून समाविष्ट करण्यात आले.
दरम्यान, महापालिकेने योजनेच्या अनुदानात वाढ देखिल केली असून लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून दिला आहे. अशा प्रकारे भरघोस आर्थिक मदत करणारी राज्यातील पहिला महापालिका म्हणून ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. प्रशासनाने गणेशोत्सवात महिलांना आर्थिक मदत करून सणासुदीच्या काळात उत्साहाचे वातावरण केले असल्याने वंचित आणि गरजू महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला आहे.


कचरावेचक ४५ महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपये, असे सात लाख २० हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या ३२४ महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये असे दोन कोटी ५० लाख ७५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. १५१८ विधवा महिलांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे तीन कोटी ७९ लाख ५० हजार रुपये वाटप करण्यात आले. ६० वर्षीय १४,९५२ महिलांना उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये असे १७ कोटी ९४ लाख २४ हजार रुपयांचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस