Monday, July 8, 2024
Homeक्रीडाIND Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहलीला का दिला आराम, समोर...

IND Vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहलीला का दिला आराम, समोर आले कारण

मुंबई: वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) आणि विराट कोहलीला(virat kohli) आराम देण्याच्या निर्णयावरून सवाल उपस्थित केले जात आहेत. वनडे मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रशिक्षक राहुल द्रविडने या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल द्रविडचे म्हणणे आहे की वर्ल्डकप पाहता विराट कोहली आणि रोहित शर्माला आराम देण्यात आला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलयाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात संघाचा भाग असणार नाहीत. दरम्यान, तिसऱ्या वनडेसाठी हे दोघेही संघात परतणार आहेत. राहुल द्रविड म्हणाला, आराम देण्याचा निर्णय खेळाडूंशी बोलूनच घेतला आहे. वर्ल्डकपच्या आधी हे दोन्ही खेळाडू शारिरीक आणि मानसिकरित्या फिट असणे संघासाठी महत्त्वाचे आहे.

याआधीही गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेतही रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटच्या दोन सामन्यांमध्ये आराम देण्यात आला. आशिया चषकात जरी कर्णधार रोहित शर्मा सर्व सामन्यांमध्ये प्लेईंग ११चा भाग होता. मात्र विराट कोहलीला फायनलआधी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आराम देण्यात आला होता.

विराट आणि रोहितवरून केले सवाल

वर्ल्डकपआधी या दोन्ही खेळाडूंना कमी वनडे सामने खेळायला देणे यावरून सवाल उपस्थित केले जात होते. विराट कोहली जगातील सर्वात फिट क्रिकेटर मानला जातो. असे असतानाही इतक्या सामन्यात विराटला आराम देणे हे समजण्याच्या पलीकडे आहे. इतकंच नव्हे तर गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सगळ्यात छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकदाही मोदानात उतरलेले नाहीत. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये या दोन्ही खेळाडूंना पुन्हा संधी मिळणार की नाही यावरही आता सवाल केले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -