Supreme court hearings : गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी तीन मोठ्या घडामोडी

१८ सप्टेंबरला काय होणार?


मुंबई : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगबग सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने (Central government) विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन १८ सप्टेंबर म्हणजेच गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सुरु होणार आहे. पण याच दिवशी राज्याच्या दृष्टीने आणखी दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या केसेसची सुनावणी पार पडणार आहे. या तीन घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा आहे.


निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने (Thackeray group) सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शिवाय विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीला उशीर करत आहेत, याबद्दल देखील ठाकरे गटाने याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला एक वर्ष उलटून गेले आहे. निवडणूक आयोगाने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. हा निकाल चुकीचा ठरवत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कोर्ट काय निकाल देतं, हे पाहावं लागेल. शिवाय १६ आमदारांच्या अपात्रतेचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न आता आणखी लांबणीवर गेल्याने सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर काय टिपण्णी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Water Cut : पुण्यात सोमवारपासून २५ टक्के पाणीकपात

पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त

Nasrapur : नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

पुणे  : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

पंढरपूर : पंढरपुरचे विठ्ठल मंदिर २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली