Toll pass : रस्तो गेलो खड्ड्यात त्यात टोल फ्री पास मिळूक नाय... चाकरमान्यांनी कोकणात जाऊचा कसा?

  159

चतुर्थीच्या सणाक रव्हले फक्त दोन दिवस


गणेशोत्सव म्हटलं की चाकरमान्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. पटापटा रजा टाकून गावच्या बॅगा भरल्या जातात. कोकणात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु होते आणि मुंबईत असलेल्या आपल्या नातेवाईकांची अख्खं कोकण आतुरतेने वाट पाहू लागतं. गावच्या ओढीने मुंबईत चाकरमानीही अस्वस्थ झालेला असतो. मात्र, या चाकरमान्यांच्या अस्वस्थतेत भर टाकण्याचीच कामे केली जातात. याचे कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरुन जाण्यासाठी देण्यात येणारे टोलमाफीचे पासेस अजून दिलेले नाहीत. त्यामुळे आता जायचे कधी, तयारी कधी करायची आणि खर्च कसा सांभाळायचा या सर्वच गोष्टींमुळे चाकरमानी पार वैतागून गेला आहे.


मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा आता नव्याने सांगायची गरजच नाही. अनेकदा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केल्यावरही गणेशोत्सवाच्या आधी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षीही कोकणात जाताना महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांची पाठ, मान आणि कंबर चांगलीच मोडणार आहे. आता हे दुखणं कमी होतं की काय म्हणून आता टोलमाफीसाठी दिेले जाणारे पासेसही अजून मिळालेले नाहीत.


पोलिसांना या पासेसबाबत विचारले असता आम्हाला कोणतेही आदेश आलेले नाहीत, त्यामुळे काही सांगू शकत नाही अशी उत्तरे मिळत आहेत. गणेशोत्सवाला अवघे दोनच दिवस राहिलेले असताना आता चाकरमान्यांनी टोलमाफीचे पासेस आणायचे तरी कुठून आणि कसे? कोकणात जाणार्‍या रेल्वेही फुल्ल झाल्या आहेत. विमानसेवेतही अनेक अडचणी निर्माण झाल्याने ती बंद झाली आहे. त्यामुळे आता रस्तेमार्गाशिवाय पर्याय नाही. अनेकजण खाजगी वाहनांनी कोल्हापूरमार्गे गावी जाण्याचा बेत आखत आहेत, मात्र टोलनाक्यांवर प्रचंड टोल आकारला जातो, यावेळेस गरजेचे असणारे टोलमाफीचे पासेस कधी मिळणार या चिंतेने कोकणवासी मुंबईकर ग्रासला आहे. त्याच्या या चिंता लवकरात लवकर पळान जाऊ देत आणि त्याका तुज्या दर्शनाक कोकणात येऊक मिळान दे रे म्हाराजा!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी