Toll pass : रस्तो गेलो खड्ड्यात त्यात टोल फ्री पास मिळूक नाय... चाकरमान्यांनी कोकणात जाऊचा कसा?

चतुर्थीच्या सणाक रव्हले फक्त दोन दिवस


गणेशोत्सव म्हटलं की चाकरमान्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. पटापटा रजा टाकून गावच्या बॅगा भरल्या जातात. कोकणात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु होते आणि मुंबईत असलेल्या आपल्या नातेवाईकांची अख्खं कोकण आतुरतेने वाट पाहू लागतं. गावच्या ओढीने मुंबईत चाकरमानीही अस्वस्थ झालेला असतो. मात्र, या चाकरमान्यांच्या अस्वस्थतेत भर टाकण्याचीच कामे केली जातात. याचे कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरुन जाण्यासाठी देण्यात येणारे टोलमाफीचे पासेस अजून दिलेले नाहीत. त्यामुळे आता जायचे कधी, तयारी कधी करायची आणि खर्च कसा सांभाळायचा या सर्वच गोष्टींमुळे चाकरमानी पार वैतागून गेला आहे.


मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा आता नव्याने सांगायची गरजच नाही. अनेकदा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केल्यावरही गणेशोत्सवाच्या आधी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षीही कोकणात जाताना महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांची पाठ, मान आणि कंबर चांगलीच मोडणार आहे. आता हे दुखणं कमी होतं की काय म्हणून आता टोलमाफीसाठी दिेले जाणारे पासेसही अजून मिळालेले नाहीत.


पोलिसांना या पासेसबाबत विचारले असता आम्हाला कोणतेही आदेश आलेले नाहीत, त्यामुळे काही सांगू शकत नाही अशी उत्तरे मिळत आहेत. गणेशोत्सवाला अवघे दोनच दिवस राहिलेले असताना आता चाकरमान्यांनी टोलमाफीचे पासेस आणायचे तरी कुठून आणि कसे? कोकणात जाणार्‍या रेल्वेही फुल्ल झाल्या आहेत. विमानसेवेतही अनेक अडचणी निर्माण झाल्याने ती बंद झाली आहे. त्यामुळे आता रस्तेमार्गाशिवाय पर्याय नाही. अनेकजण खाजगी वाहनांनी कोल्हापूरमार्गे गावी जाण्याचा बेत आखत आहेत, मात्र टोलनाक्यांवर प्रचंड टोल आकारला जातो, यावेळेस गरजेचे असणारे टोलमाफीचे पासेस कधी मिळणार या चिंतेने कोकणवासी मुंबईकर ग्रासला आहे. त्याच्या या चिंता लवकरात लवकर पळान जाऊ देत आणि त्याका तुज्या दर्शनाक कोकणात येऊक मिळान दे रे म्हाराजा!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात