Charter plane: मुंबई एअरपोर्टवर चार्टर प्लेनला अपघात, २ जखमी

  228

मुंबई: मुंबई एअरपोर्टवर (Mumbai airport) गुरूवारी चार्टर प्लेनला(charter plane) झालेल्या अपघातात २ जण जखमी झाले आहे. यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एअरपोर्टच्या रनवे २७वर झाला आहे. प्राथमिक तपासणीदरम्यान ओव्हर शूट असल्याचे समोर आले आहे. यात कोणीही व्हीआयपी प्रवास करत नव्हते. दरम्यान, अपघाताच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.


डीजीसीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे की खराब हवामानामुळे हा अपघात झाला. या अपघातामुळे एअरपोर्टवर लँडिंग आणि टेकऑफ थांबवण्यात आले आहेत. या खाजगी विमानात २ क्रू मेंबरसोबत ६ प्रवासी प्रवास करत होते. ही घटना गुरूवारी संध्याकाळी घडली. यात खासगी विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.


 


सूत्रांच्या माहितीनुसार हे खासगी विमान विशाखापट्टणम येथून मुंबईत पोहोचले होते त्याच वेळेस हा अपघात झाला. यात जखमी झालेल्या दोन व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे व्हीएसआर वेंचर्स लिअरजेट ४५ विमान सांगितले गेले आहे. एएनआयच्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे दृश्यता ७०० मीटर होती.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.