J&K: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, कर्नल, मेजर तसेच डीएसपी शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिग कर्नल आणि एक मेजर शहीद झाले आहेत. हे अधिकारी 19RR ची कमान सांभाळत होते. भारतीय लष्कराने याला दुजोरा दिला आहे.


याशिवाय जम्मू-काश्मीरचे पोलीस डीएसपीही शहीद झाले असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांशी चकमकीत कर्नल मनप्रीत सिंह आणि मेजर आशिष धौनेक शहीद झाले आहेत. तर डीएसपी हुमायू भट शहीद झाले आहेत.



दहशतवाद्यांनी गोळीबार केला


ही चकमक अनंतनागच्या गुडूल गावात झाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त टीमला या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी विशेष घेराबंदी तसेच तपास अभियान सुरू केले होते. त्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या प्रारंभित गोळीबारीत ३ सुरक्षा अधिकारी गंभीररित्या जखमी झाले. यात दोन एक कर्नल आणि एक मेजर अधिकारी आहेत तर एक जम्मू-काश्मीरचे पोलीस डीएसपी आहेत.



अचानक सुरक्षा दलांवर केला हल्ला


जेव्हा यांना रुग्णालयात नेले जात होते त्याचवेळेस त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार या भागात दोन ते तीन दहशतवादी होते त्यांनी गोळीबार केला होता.



जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी व्यक्त केला शोक


जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ट्वीट करत या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. मी लष्कराचे बहादूर रायफलमॅन रवी यांच्या साहस आणि सर्वोच्च बलिदानाला सलाम. देशाच्या प्रती त्यांची निस्वार्थ सेवा नेहमीच लक्षात ठेवली जाईल.


Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या