IND vs PAK: पाकिस्तानला हरवल्यानंतर रोहितकडून खेळाडूंचे कौतुक

कोलंबो: टीम इंडियाने (team india) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला(pakistan) २२८ धावांनी हरवले. भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत १२८ धावांवर आटोपला. धावांच्या हिशोबाने पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सगळ्यात मोठा विजय आहे.


या सामन्यात टीम इंडियाकडून विराट कोहली आणि के एल राहुल यांनी शानदार शतके ठोकली. या मोठ्या विजयानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंचे जोरदार कौतुक केले.



कर्णधार रोहितने खेळाडूंचे कौतुक केले


कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटले, आम्हाला फक्त काही वेळासाठी मैदानात जायचे होते. मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर हे शक्य झाले. मला माहित आहे की संपूर्ण मैदान झाकणे आणि कव्हर हटवणे किती कठीण आहे. संपूर्ण संघाकडून आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतो.


फलंदाजीबाबत बोलताना रोहित म्हणाला, आम्हाला माहीत होते की विकेट चांगली आहे आणि आम्हाला पावसासोबत ताळमेळ बसवावा लागेल. विराट कोहली आणि लोकेश राहुलला पकड मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि आम्ही त्यानंतर पुढे जाऊ शकतो.



बुमराहच्या पुनरागमनाबाबत


वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली. रोहित म्हणाला, बुमराह चांगला वाटत आहे. त्याने बॉल दोन्ही बाजूनी फिरवला गेल्या ८-१० महिन्यांत त्याने कठोर मेहनत घेतली. बुमराह केवळ २९ वर्षांचा आहे त्याने सामना सोडणे आदर्श नाही मात्र तो ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यावरून समजते की तो काय करत आहे.


विराटने छान खेळई केली. आणि केएल राहुल दुखापतीतून परतल्यानंतर आणि टॉसच्या ५ मिनिटे आधी खेळण्यास आम्ही त्याला तयार होण्यास सांगितले. ही खेळाडूची मानसिकता दर्शवते.

Comments
Add Comment

Murlidhar Mohol : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ बिनविरोध

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) अध्यक्षपदी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि केंद्रीय

सुनील नरेनचे नवे विक्रम ! आयपीएलच्या इतिहासात असं करणारा तिसरा गोलंदाज....

KKR VS SRH : वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू सुनील नरेनने आता एक नवा विक्रम आपल्या नावी केला आहे. त्याने रविवारी ३ मे रोजी

IPL 2026 च्या प्लेऑफचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, BCCI कडून आली मोठी अपडेट....

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४४ साखळी सामने शनिवार २ मे पर्यंत खेळून झाले. यंदाच्या हंगामात ७० साखळी सामने रंगणार आहेत.

मुंबईच्या पराभावनंतर दिग्गज खेळाडू संतापला.. हार्दिकवर जोरदार टिका; वो दिखाऊ कॅप्टेन हे....

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईने नऊ साखळी

प्लेऑफशीची शर्यत रंगली ; अव्वल स्थानासाठी टॉप पाच संघात झुंज.....

IPL 2026 : आयपीएल २०२६ आता रंगतदार होताना दिसत आहे. गुणवतालिकेत अव्वल पाच संघात जोरदार सामने होत आहेत. प्रत्येक संघ

Thomas Cup 2026 : भारताचा उपांत्य फेरीत फ्रान्सकडून पराभव; कांस्य पदकावर समाधान

कोपनहेगन : डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे झालेल्या थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला