‘आता पाकव्याप्त काश्मीरही भारतात येईल’

माजी लष्करप्रमुखांचा दावा


नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतात कधी सामील होईल, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या मु्द्द्यावर विरोधकांकडूनही सरकारची कोंडी केली जाते. आता केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह (V K Singh) यांनी पीओकेबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. भाजपाच्या परिवर्तन संकल्प यात्रेनिमित्त सिंह राजस्थानात आल होते. येथील एका कार्यक्रमात सिंह यांना पत्रकारांनी पीओकेमधील लोक भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर भाजपची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर व्ही. के. सिंह यांनी उत्तर दिले.





सिंह म्हणाले, पीओके आपोआप भारतात विलीन होईल. पण यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल.


नवी दिल्लीत पार पडलेल्या जी २० परिषदेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भारतात ज्या प्रकारे जी २० चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या माध्यमातून भारताने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोणत्याही देशाने विचार केला नसेल की भारताकडून अशा पद्धतीने एखाद्या जागतिक परिषदेचे आयोजन केले जाईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताने हे कर्तुत्व सिद्ध केले आहे, असे सिंह म्हणाले.


काश्मिरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असल्याचे म्हटले आहे. पीओकेतील शहरे आणि गावांमधील लोक अन्न टंचाई, महागाई, उच्च करांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण प्रदेशात होत असलेल्या या निषेधासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्यात येत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील

Delhi Airport : पश्चिम आशियातील तणावामुळे दिल्ली विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये वाढत्या संघर्षामुळे दिल्ली विमानतळावरील अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. काही

Israel - Iran War : पंतप्रधान मोदींची इराण - इस्रायलच्या प्रमुखांशी चर्चा; सुरक्षा मंत्रिमंडळासोबत बैठक

अमेरिका - इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर,