सोलापूर : धनगर समाजही आरक्षणासाठी (Dhangar Reservation) आक्रमक झाला असून यापुढे विखे बाप-लेकाला मतदान करायचे नाही. असा ठाम निर्धार धनगर समाजाने केला आहे.
राज्याचे महसूल मंत्री तसेच नगर व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फेकलेल्या भंडाऱ्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. आपल्या मतांवर निवडणून आलेले विखे पिता पुत्रांना यापुढे मतदान करायचे नाही. त्यांना आमची मतं चालतात मात्र भंडारा नाही, अशा कडव्या शब्दांत धनगर समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध केला.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावामध्ये धनगर समाजातील काहींनी विखेंच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, त्यांना आपली मते चालतात मात्र त्यांना आपला पिवळा भंडारा चालत नाही. आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी भंडारा आम्ही इतरांना लावतो. मात्र यांना तो सहन झाला नाही. त्यामुळे आता समाज बांधवांनी या विखे पिता पुत्रांना मतदान करायचे नाही हे सुद्धा लक्षात ठेवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी सोलापुरात गेले होते. त्याचवेळी धनगर आंदोलक शेखर बंगाळे हे विखे पाटलांना आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आले होते. त्याचवेळी बंगाळे यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळल्याची घटना घडली होती. त्यानंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांनी बंगाळे याला मारहाण केल्याचं दिसून आलं होतं. याच मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…