Dhangar Reservation : धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक!

सोलापूर : धनगर समाजही आरक्षणासाठी (Dhangar Reservation) आक्रमक झाला असून यापुढे विखे बाप-लेकाला मतदान करायचे नाही. असा ठाम निर्धार धनगर समाजाने केला आहे.


राज्याचे महसूल मंत्री तसेच नगर व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फेकलेल्या भंडाऱ्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. आपल्या मतांवर निवडणून आलेले विखे पिता पुत्रांना यापुढे मतदान करायचे नाही. त्यांना आमची मतं चालतात मात्र भंडारा नाही, अशा कडव्या शब्दांत धनगर समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध केला.


पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावामध्ये धनगर समाजातील काहींनी विखेंच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले, त्यांना आपली मते चालतात मात्र त्यांना आपला पिवळा भंडारा चालत नाही. आज ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी भंडारा आम्ही इतरांना लावतो. मात्र यांना तो सहन झाला नाही. त्यामुळे आता समाज बांधवांनी या विखे पिता पुत्रांना मतदान करायचे नाही हे सुद्धा लक्षात ठेवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आढावा बैठकीसाठी सोलापुरात गेले होते. त्याचवेळी धनगर आंदोलक शेखर बंगाळे हे विखे पाटलांना आरक्षणाच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आले होते. त्याचवेळी बंगाळे यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळल्याची घटना घडली होती. त्यानंतर विखेंच्या सुरक्षा रक्षकांनी बंगाळे याला मारहाण केल्याचं दिसून आलं होतं. याच मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग

दिवाळीच्या सुट्टीत फिरण्याचे नियोजन करताय ? 'या' चार जागांना नक्की भेट द्या

मुंबई : पावसाळ्यातली हिरवळ अनुभवल्यानंतर आता गुलाबी थंडीची चाहुल सर्वांना लागली आहे. त्यामुळे छान थंड हवेच्या

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल ३१,६२८ कोटींची मदत; २५३ तालुक्यांना सरसकट मदत देणार

'खरडून गेलेल्या जमिनीला' मिळणार हेक्टरी ३.४७ लाखांची मदत; शेतकरी, घरे आणि जनावरांसाठी भरीव निधी मुंबई: