Pune Crime : संशयाच्या भूताने पछाडलं आणि नवर्‍याने लग्नाच्या दीड वर्षाच्या आतच बायकोला संपवलं...

काय आहे प्रकरण?


पुणे : पुण्यात हल्ली गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. पण केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यभरातून चित्रविचित्र गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. मानेवर संशयाचं भूत बसलं असेल तर एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, हे ऐकून थरकाप उडतो. पुण्याच्या येरवडा भागात घडलेली घटना तर संताप आणणारी आहे. पुण्यात दीड वर्षापूर्वीच लग्न झालेल्या एका पतीने चारित्र्यावरुन संशय घेत आपल्या पत्नीवर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे. या जोडप्याला सात महिन्यांची एक कोवळी मुलगीदेखील होती. पतीच्या या कृत्यामुळे त्या चिमुरडीलाही बालवयात आपली आई गमवावी लागली आहे.


रुपाली उर्फ बबिता भोसले (वय ३५ वर्षे) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून आशिष भोसले (वय ३२ वर्षे) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी स्वप्नी बाळासाहेब खांडवे यांनी विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी आशिष भोसलेला अटक केली आहे. विमानतळ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.


रुपाली आणि आशिष यांचं लग्न दीड वर्षांपूर्वी झालं होतं. लोहगावमधील संतनगरमध्ये ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. आशिष हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो तर रुपाली धुणे-भांडी करुन घर चालवत होती. त्यांना सात महिन्यांची मुलगी देखील आहे. अशिष हा रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडणे होतं असत. दरम्यान शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडण झालं. यावेळी आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. तसेच आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. या घटनेबाबत समजताच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. उपचारासाठी रुपाली भोसले यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या असल्याने उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस