Pune Crime : संशयाच्या भूताने पछाडलं आणि नवर्‍याने लग्नाच्या दीड वर्षाच्या आतच बायकोला संपवलं...

  78

काय आहे प्रकरण?


पुणे : पुण्यात हल्ली गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. पण केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यभरातून चित्रविचित्र गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. मानेवर संशयाचं भूत बसलं असेल तर एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, हे ऐकून थरकाप उडतो. पुण्याच्या येरवडा भागात घडलेली घटना तर संताप आणणारी आहे. पुण्यात दीड वर्षापूर्वीच लग्न झालेल्या एका पतीने चारित्र्यावरुन संशय घेत आपल्या पत्नीवर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे. या जोडप्याला सात महिन्यांची एक कोवळी मुलगीदेखील होती. पतीच्या या कृत्यामुळे त्या चिमुरडीलाही बालवयात आपली आई गमवावी लागली आहे.


रुपाली उर्फ बबिता भोसले (वय ३५ वर्षे) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून आशिष भोसले (वय ३२ वर्षे) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी स्वप्नी बाळासाहेब खांडवे यांनी विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी आशिष भोसलेला अटक केली आहे. विमानतळ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.


रुपाली आणि आशिष यांचं लग्न दीड वर्षांपूर्वी झालं होतं. लोहगावमधील संतनगरमध्ये ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. आशिष हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो तर रुपाली धुणे-भांडी करुन घर चालवत होती. त्यांना सात महिन्यांची मुलगी देखील आहे. अशिष हा रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडणे होतं असत. दरम्यान शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडण झालं. यावेळी आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. तसेच आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. या घटनेबाबत समजताच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. उपचारासाठी रुपाली भोसले यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या असल्याने उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या