India Vs Pakistan: राखीव दिवशी सामना नाही झाला तर काय? पावसाची किती शक्यता...घ्या जाणून

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) सातत्याने भारत(india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील सामन्यात पावसाचाच खेळ सुरू आहे. या स्पर्धेतील संघांदरम्यानचा दुसरा सामना रविवारी खेळवण्यात आला. मात्र पावसाने या सामन्यात खोडा घातल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आज म्हणजेच सोमवारी राखीव दिवशी हा सामना होमार आहे.


टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात २४.१ षटकांचाच खेळ करता आला. त्यानंतर पाऊस थांबण्याचे नावच घेईना अखेर हा सामना थांबवण्यात आला. मुसळधार पावसामुळे रविवारी सामना पूर्ण होऊ शकला नाही. आशिया चषक २०२३च्या फायनल आणि भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला. आता हा सामना आज म्हणजेच सोमवारी ११ सप्टेंबरला होईल.


भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २४.१ षटकांत १४७ धावा केल्या होत्या. आता राखीव दिवशी याच धावसंख्येवरून पुढील सामना सुरू होईल. मात्र सोमवारीही कोलंबोचे हवामान चांगले दिसत नाही आहे.


कोलंबोमध्ये सोमवारी पावाची ९९ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच सामना रंगण्याची कोणतीही आशा नाही. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ९५ टक्के आहे. हवेचा वेगही ४१ किमी/प्रति तास राहील.



राखीव दिवशी पाऊस आला तर काय?


राखीव दिवशी भारताच्या २ बाद १४७ वरून डाव सुरू होईल. मात्र तेथील हवामान पाहता चाहत्यांच्या मनात सवाल येत आहे की जर राखीव दिवशी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल? याचे उत्तर आहे की जर राखीव दिवशी सामना झाला नाही तर तो रद्द करण्यात येईल. अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एकएक गुण दिला जाईल.


नियमानुसार एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये निकालासाठी दोन्ही डावांत कमीत कमी २०-२० षटकांचा खेळ होणे गरजेचे असते. जर राखीव दिवशी पाऊस आला तर पाकिस्तानला कमीत कमी २० षटकांचा खेळ करावा लागेल. पाकिस्तानचा संघ २० षटकेही खेळू शकला नाही तर सामना रद्द होईल.

Comments
Add Comment

IPL Playoff 2026 : RCB, GT, SRH आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल

मुंबई : आयपीएल २०२६ च्या अंतिम टप्प्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात राजस्थान रॉयल्सने

IPL मध्ये लाजिरवाणी घटना! चिअरलिडर्ससोबत दुर्व्यवहार ; मैदानातच रंगला हायव्होल्टेज ड्रामा

LSG VS PBKS : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यादरम्यान एक अत्यंत

IPL प्रसारणामधील “सलाम मुंबई” ऐवजी “नमस्कार मुंबई” प्रदर्शित करण्याची भाजयुमो, मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांची मागणी

IPL  2026 : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री दिपक सिंह यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री

Sara Tendulkar : अर्जुनच्या पदार्पणाने तेंडुलकर कुटुंब भावूक; बहिण सारा आणि पत्नी सानियाची खास पोस्ट चर्चेत

IPL 2026 LSG VS PBKS : आयपीएल २०२६ मध्ये अखेर सचिन तेंडुलकरच्या मुलाला लखनउ सुपर जायंट्सकडून खेळण्याची संधी मिळाली.

KKR vs DC : आज आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्ध केकेआर आमने सामने, केकेआरकडे प्लेऑफमध्ये जाण्याची शेवटची संधी

IPL 2026 : आयपीएल 2026 मधील लीग टप्प्यातील अखेरचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार

IPL 2006 : कोलकातासाठी विजय अनिवार्य

- सुशील परब कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील साखळी फेरीतील महत्त्वाचा सामना