India Vs Pakistan: राखीव दिवशी सामना नाही झाला तर काय? पावसाची किती शक्यता...घ्या जाणून

कोलंबो: आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) सातत्याने भारत(india) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील सामन्यात पावसाचाच खेळ सुरू आहे. या स्पर्धेतील संघांदरम्यानचा दुसरा सामना रविवारी खेळवण्यात आला. मात्र पावसाने या सामन्यात खोडा घातल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आज म्हणजेच सोमवारी राखीव दिवशी हा सामना होमार आहे.


टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाला या सामन्यात २४.१ षटकांचाच खेळ करता आला. त्यानंतर पाऊस थांबण्याचे नावच घेईना अखेर हा सामना थांबवण्यात आला. मुसळधार पावसामुळे रविवारी सामना पूर्ण होऊ शकला नाही. आशिया चषक २०२३च्या फायनल आणि भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला. आता हा सामना आज म्हणजेच सोमवारी ११ सप्टेंबरला होईल.


भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २४.१ षटकांत १४७ धावा केल्या होत्या. आता राखीव दिवशी याच धावसंख्येवरून पुढील सामना सुरू होईल. मात्र सोमवारीही कोलंबोचे हवामान चांगले दिसत नाही आहे.


कोलंबोमध्ये सोमवारी पावाची ९९ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच सामना रंगण्याची कोणतीही आशा नाही. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ९५ टक्के आहे. हवेचा वेगही ४१ किमी/प्रति तास राहील.



राखीव दिवशी पाऊस आला तर काय?


राखीव दिवशी भारताच्या २ बाद १४७ वरून डाव सुरू होईल. मात्र तेथील हवामान पाहता चाहत्यांच्या मनात सवाल येत आहे की जर राखीव दिवशी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल? याचे उत्तर आहे की जर राखीव दिवशी सामना झाला नाही तर तो रद्द करण्यात येईल. अशातच दोन्ही संघांना प्रत्येकी एकएक गुण दिला जाईल.


नियमानुसार एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये निकालासाठी दोन्ही डावांत कमीत कमी २०-२० षटकांचा खेळ होणे गरजेचे असते. जर राखीव दिवशी पाऊस आला तर पाकिस्तानला कमीत कमी २० षटकांचा खेळ करावा लागेल. पाकिस्तानचा संघ २० षटकेही खेळू शकला नाही तर सामना रद्द होईल.

Comments
Add Comment

Asian Games 2026 : आशियाई खेळांसाठी भारतीय बॅडमिंटन संघाची घोषणा, सिंधू करणार नेतृत्व

नवी दिल्ली : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि विद्यमान पुरुष दुहेरीचे विजेते सात्विकसाईराज

Parul Chaudhary : पारुल चौधरीने फ्रान्समध्ये ५,००० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडला

पॅरिस : भारताच्या पारुल चौधरीने फ्रान्समधील नाईस येथे झालेल्या 'मीटिंग निकया २०२६' मध्ये महिलांच्या ५,००० मीटर

Archery World Cup 2026 : धीरज बोम्मदेवरा-कुमकुमची सोनेरी कामगिरी ! ऑलिम्पिक विजेत्यांना नमवत जिंकले गोल्ड !

मुंबई : तिरंदाजी विश्वचषक २०२६ मधून भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा धीरज बोम्मदेवरा आणि कुमकुम

FIFA WORLDCUP 2026 : 'सुपर संडे'ला फुटबॉलचा महाकुंभ; जर्मनी आणि नेदरलँड्ससह बड्या संघांची प्रतिष्ठा पणाला

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आज स्पर्धेचा चौथा दिवस असून, फुटबॉल प्रेमींसाठी हा 'सुपर संडे' ठरणार आहे. आजच्या दिवशी

Mumbai T20 league 2026 Final : मुंबई टी-२० लीग फायनलमध्ये राडा, तुषार देशपांडे आणि गौरव जठारमध्ये वाद; नेमकं घडलं काय ?

मुंबई : मुंबई टी-२० लीग २०२६ चा अंतिम सामना (१३ जून ) मराठा रॉयल्स आणि ARCS Andheri यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईच्या

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रेलियाचा तुर्कस्तानवर २-० ने दणदणीत विजय; इरानकुंडा आणि मेटकाफ चमकले

Los Angeles: फिफा विश्वचषक २०२६ च्या गट 'ड' मधील चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (सॉकरूज) तुर्कस्तानचा २-० असा पराभव करत