India vs Pakistan: पावसाने सामना धुतल्यास पाकिस्तानला किती धावांचे मिळणार आव्हान

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये भारतीय संघ (indian team) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील महामुकबाल कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. कोलंबोमध्ये मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. पिच कव्हर्सने झाकण्यात आले आहे.


सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने सलामीला दमदार कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि आणि शुभमन गिलने मिळून १२१ धावांची सलामी केली.



रोहित आणि गिलचे अर्धशतक


सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ बॉलमध्ये ५६ धावा केल्या. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. रोहितने ४२ बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. तर शुभमन गिलने ५२ बॉलमध्ये ५८ धावांची खेळी केली.


पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने २ बाद १४७ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा विराट कोहली ८ आणि के एल राहुल १७ धावा करून नाबाद राहिला आहे. आता चाहत्यांच्या मनात सवाल आहे की जर पावसामुळे खेळ झाला नाही तर काय होईल. दुसरे हे की जर पाऊस उशिरापर्यंत राहिला तर पाकिस्तानला किती षटकांमध्ये किती धावा मिळणार आहे.


 


रिझर्व्ह डेला होऊ शकतो सामना


जर पाऊस थांबला नाही तर सामना पुढील दिवस रिझर्व्ह डेला खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट कौन्सिलने फायनलशिवाय भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक रिझर्व्ह डे ठेवला. अशातच चाहते निराश होण्याची गरज नाही.


जर आज पाऊस थोडा थांबला तर त्या स्थितीत भारताला बॅटिंग दिली जाणार नाही. वेळेनुसार पाऊस थांबला तर २० ते २४ षटकांचा खेळ होऊ शकतो.



सामना झाल्यास पाकिस्तानला किती धावांचे मिळणार आव्हान?


२० षटकांत - १८१ धावांचे आव्हान
२१ षटकांत - १८७ धावांचे आव्हान
२२ षटकांत - १९४ धावांचे आव्हान
२३ षटकांत - २०० धावांचे आव्हान
२४ षटकांत - २०६ धावांचे आव्हान

Comments
Add Comment

Murlidhar Mohol : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ बिनविरोध

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) अध्यक्षपदी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि केंद्रीय

सुनील नरेनचे नवे विक्रम ! आयपीएलच्या इतिहासात असं करणारा तिसरा गोलंदाज....

KKR VS SRH : वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू सुनील नरेनने आता एक नवा विक्रम आपल्या नावी केला आहे. त्याने रविवारी ३ मे रोजी

IPL 2026 च्या प्लेऑफचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, BCCI कडून आली मोठी अपडेट....

मुंबई : आयपीएल २०२६ मधील ४४ साखळी सामने शनिवार २ मे पर्यंत खेळून झाले. यंदाच्या हंगामात ७० साखळी सामने रंगणार आहेत.

मुंबईच्या पराभावनंतर दिग्गज खेळाडू संतापला.. हार्दिकवर जोरदार टिका; वो दिखाऊ कॅप्टेन हे....

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईने नऊ साखळी

प्लेऑफशीची शर्यत रंगली ; अव्वल स्थानासाठी टॉप पाच संघात झुंज.....

IPL 2026 : आयपीएल २०२६ आता रंगतदार होताना दिसत आहे. गुणवतालिकेत अव्वल पाच संघात जोरदार सामने होत आहेत. प्रत्येक संघ

Thomas Cup 2026 : भारताचा उपांत्य फेरीत फ्रान्सकडून पराभव; कांस्य पदकावर समाधान

कोपनहेगन : डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे झालेल्या थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला