India vs Pakistan: पावसाने सामना धुतल्यास पाकिस्तानला किती धावांचे मिळणार आव्हान

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये भारतीय संघ (indian team) आणि पाकिस्तान (pakistan) यांच्यातील महामुकबाल कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. कोलंबोमध्ये मुसळधार पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. पिच कव्हर्सने झाकण्यात आले आहे.


सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने सलामीला दमदार कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि आणि शुभमन गिलने मिळून १२१ धावांची सलामी केली.



रोहित आणि गिलचे अर्धशतक


सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने ४९ बॉलमध्ये ५६ धावा केल्या. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. रोहितने ४२ बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. तर शुभमन गिलने ५२ बॉलमध्ये ५८ धावांची खेळी केली.


पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने २ बाद १४७ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा विराट कोहली ८ आणि के एल राहुल १७ धावा करून नाबाद राहिला आहे. आता चाहत्यांच्या मनात सवाल आहे की जर पावसामुळे खेळ झाला नाही तर काय होईल. दुसरे हे की जर पाऊस उशिरापर्यंत राहिला तर पाकिस्तानला किती षटकांमध्ये किती धावा मिळणार आहे.


 


रिझर्व्ह डेला होऊ शकतो सामना


जर पाऊस थांबला नाही तर सामना पुढील दिवस रिझर्व्ह डेला खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट कौन्सिलने फायनलशिवाय भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक रिझर्व्ह डे ठेवला. अशातच चाहते निराश होण्याची गरज नाही.


जर आज पाऊस थोडा थांबला तर त्या स्थितीत भारताला बॅटिंग दिली जाणार नाही. वेळेनुसार पाऊस थांबला तर २० ते २४ षटकांचा खेळ होऊ शकतो.



सामना झाल्यास पाकिस्तानला किती धावांचे मिळणार आव्हान?


२० षटकांत - १८१ धावांचे आव्हान
२१ षटकांत - १८७ धावांचे आव्हान
२२ षटकांत - १९४ धावांचे आव्हान
२३ षटकांत - २०० धावांचे आव्हान
२४ षटकांत - २०६ धावांचे आव्हान

Comments
Add Comment

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत