Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्री विखेपाटलांवर चक्क भंडारा उधळला

  137

आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी काय काय पाहायला मिळणार?


सोलापूर : राज्यभरात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा जोर धरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या गोंधळातच आता इतर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसत आहेत. धनगर समाजही पेटून उठला आहे. आज तर सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अंगावर भंडारा उधळला. सोलापूर (Solpaur news) शासकीय विश्रामगृहात ही घटना घडली. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी काय काय पाहायला मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.


धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण त्यावर मार्ग न निघाल्याने आज शासकीय विश्रामगृहात या समाजाचे काही प्रतिनिधी आक्रमक झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला.



नेमकं काय घडलं?


सोलापूर दौर्‍यादरम्यान मंत्री विखे पाटील आज शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते व आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले. राधाकृष्ण विखे पाटील निवेदनाचे वाचन करत असताना बंगाळे यांनी सर्वांचीच नजर चुकवून खिशातील भंडारा काढून पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर टाकला व घोषणा दिल्या.


विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली. सध्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्थानकात या कार्यकर्त्यांना नेण्यात आलं आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक