Jan Aashirwad Yatra : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर दगडफेक

नीमच: मध्य प्रदेशात (madhya pradesh) विधानसभा निवडणुकीआधी काढल्या जात असलेल्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर (jan ashirvad yatra) दगडफेक करण्यात आली. नीमचच्या मनासा येथे ही दगडफेकीची घटना घडली. ज्यावेळेस ही दगडफेक करण्यात आली त्यावेळी भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय आणि मंत्री मोहन यादव या रथावर होते.


दगडफेकीत अनेक गाडींचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष वी डी शर्मा म्हणाले, की अशा घटनांनी आम्ही घाबरणार नाही. भाजपने मध्य प्रदेशात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. नीमचमधील या आशीर्वाद यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आली. यात रथासह पोलिसांच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर रथामध्ये भाजपचे नेते कैलाश विजय वर्गीय आणि मंत्री मोहन यादव उपस्थित होते.


आज ही यात्रा मनासा विधानसभेच्या रावडी कूवि गावांत पोहोचली तेव्हा तेथील ग्रामीण लोकांनी यावेळेस दगडफेक केली. चीता प्रोजेक्टमध्ये वन विभागाकडून भूमी अधिग्रहण केल्याने हे ग्रामस्थ चिडले होते. त्यावेळेस त्यांनी या रथयात्रेवर दगडफेक केली. यात अर्धा डझनहून अधिक गाड्यांचे नुकसान झालेय.



सोमवारी सुरू झाली होती यात्रा


उज्जैन संभागची जन आशीर्वाद यात्रेची सुरुवाती सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नीमचमध्ये हिरवा झेंडा दाखवत केली होती.



आम्ही घाबरणार नाही


घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले आमच्या यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आम्ही घाबरणार नाही. गरज पडल्यास पायी यात्रा करू.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला