Jan Aashirwad Yatra : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर दगडफेक

नीमच: मध्य प्रदेशात (madhya pradesh) विधानसभा निवडणुकीआधी काढल्या जात असलेल्या भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर (jan ashirvad yatra) दगडफेक करण्यात आली. नीमचच्या मनासा येथे ही दगडफेकीची घटना घडली. ज्यावेळेस ही दगडफेक करण्यात आली त्यावेळी भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय आणि मंत्री मोहन यादव या रथावर होते.


दगडफेकीत अनेक गाडींचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष वी डी शर्मा म्हणाले, की अशा घटनांनी आम्ही घाबरणार नाही. भाजपने मध्य प्रदेशात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. नीमचमधील या आशीर्वाद यात्रेच्या रथावर दगडफेक करण्यात आली. यात रथासह पोलिसांच्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर रथामध्ये भाजपचे नेते कैलाश विजय वर्गीय आणि मंत्री मोहन यादव उपस्थित होते.


आज ही यात्रा मनासा विधानसभेच्या रावडी कूवि गावांत पोहोचली तेव्हा तेथील ग्रामीण लोकांनी यावेळेस दगडफेक केली. चीता प्रोजेक्टमध्ये वन विभागाकडून भूमी अधिग्रहण केल्याने हे ग्रामस्थ चिडले होते. त्यावेळेस त्यांनी या रथयात्रेवर दगडफेक केली. यात अर्धा डझनहून अधिक गाड्यांचे नुकसान झालेय.



सोमवारी सुरू झाली होती यात्रा


उज्जैन संभागची जन आशीर्वाद यात्रेची सुरुवाती सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नीमचमध्ये हिरवा झेंडा दाखवत केली होती.



आम्ही घाबरणार नाही


घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांचे विधान समोर आले आहे. ते म्हणाले आमच्या यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आम्ही घाबरणार नाही. गरज पडल्यास पायी यात्रा करू.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च