Health: रिकाम्या पोटी करा कडुनिंबाचे सेवन, होतील जबरदस्त फायदे

मुंबई: आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुनिंबाचे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कडुनिंबाची चव जरी कडवट लागत असली तरी मात्र त्याच्यात अनेक औषधीय गुण असतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाचे सेवन केल्यास शरीराचे अधिक आजार बरे होतात. जाणून घ्या रिकाम्या पोटी कडुनिंब खाण्याचे फायदे



ब्लड शुगर नियंत्रणात


खराब लाईफस्टाईलमुळे भारतात सातत्याने डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, लोक अजूनही घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. कडुनिंबाच्या पानांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.



रक्त साफ करण्यात मदत


कडुनिंबामध्ये असे औषधीय गुण आहेत जे रक्त साफ करण्यास मदत करतात. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. रक्त साफ असेल तर तुम्हाला आजार होणार नाहीत.



पोटासाठी फायदेशीर


कडुनिंबामुळे आपली त्वचाच नव्हे तर पोटही चांगले राहते. यातील गुण अॅसिडिटीसाठी फायदेशीर ठरतात. रिकाम्या पोटी पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून प्यायल्याने अॅसिडिटी तसेच पोटदुखी बरी होते.



रोगप्रतिकारशक्ती वाढते


कडुनिंबाच्या पानामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच अँटी ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतात. तसेच सर्दी, खोकला सारखे आजारही दूर राखण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.