Health: रिकाम्या पोटी करा कडुनिंबाचे सेवन, होतील जबरदस्त फायदे

  113

मुंबई: आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुनिंबाचे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कडुनिंबाची चव जरी कडवट लागत असली तरी मात्र त्याच्यात अनेक औषधीय गुण असतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाचे सेवन केल्यास शरीराचे अधिक आजार बरे होतात. जाणून घ्या रिकाम्या पोटी कडुनिंब खाण्याचे फायदे



ब्लड शुगर नियंत्रणात


खराब लाईफस्टाईलमुळे भारतात सातत्याने डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, लोक अजूनही घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. कडुनिंबाच्या पानांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.



रक्त साफ करण्यात मदत


कडुनिंबामध्ये असे औषधीय गुण आहेत जे रक्त साफ करण्यास मदत करतात. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. रक्त साफ असेल तर तुम्हाला आजार होणार नाहीत.



पोटासाठी फायदेशीर


कडुनिंबामुळे आपली त्वचाच नव्हे तर पोटही चांगले राहते. यातील गुण अॅसिडिटीसाठी फायदेशीर ठरतात. रिकाम्या पोटी पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून प्यायल्याने अॅसिडिटी तसेच पोटदुखी बरी होते.



रोगप्रतिकारशक्ती वाढते


कडुनिंबाच्या पानामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच अँटी ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतात. तसेच सर्दी, खोकला सारखे आजारही दूर राखण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी