Health: रिकाम्या पोटी करा कडुनिंबाचे सेवन, होतील जबरदस्त फायदे

मुंबई: आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुनिंबाचे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कडुनिंबाची चव जरी कडवट लागत असली तरी मात्र त्याच्यात अनेक औषधीय गुण असतात जे आरोग्यासाठी लाभदायक आहेत. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाचे सेवन केल्यास शरीराचे अधिक आजार बरे होतात. जाणून घ्या रिकाम्या पोटी कडुनिंब खाण्याचे फायदे



ब्लड शुगर नियंत्रणात


खराब लाईफस्टाईलमुळे भारतात सातत्याने डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, लोक अजूनही घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. कडुनिंबाच्या पानांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.



रक्त साफ करण्यात मदत


कडुनिंबामध्ये असे औषधीय गुण आहेत जे रक्त साफ करण्यास मदत करतात. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. रक्त साफ असेल तर तुम्हाला आजार होणार नाहीत.



पोटासाठी फायदेशीर


कडुनिंबामुळे आपली त्वचाच नव्हे तर पोटही चांगले राहते. यातील गुण अॅसिडिटीसाठी फायदेशीर ठरतात. रिकाम्या पोटी पाण्यात कडुनिंबाची पाने टाकून प्यायल्याने अॅसिडिटी तसेच पोटदुखी बरी होते.



रोगप्रतिकारशक्ती वाढते


कडुनिंबाच्या पानामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच अँटी ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतात. तसेच सर्दी, खोकला सारखे आजारही दूर राखण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने