Maratha samaj Andolan : मराठा आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत एसटीचे तब्बल ४ कोटींचे नुकसान

  140

१९ एसटी गाड्या थांबवून करण्यात आली जाळपोळ


जालना : जालना (Jalna) येथे शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Samaj Reservation) आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला. या घटनेचे तीव्र प्रतिसाद अख्ख्या राज्यात उमटत असून मराठा आंदोलक (Maratha Andolan) अधिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको (Rasta Roko) तर काही ठिकाणी जाळपोळ करत निषेध नोंदवण्यात येत आहे. सरकारने यावर सखोल चौकशीचे व कारवाईचे आदेश दिलेले असले तरी मराठा आंदोलकांचा रोष मात्र कायम आहे. यातूनच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १९ बसेसची (ST Buses) तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एसटी महामंडळाचे जवळपास ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


जालन्यात आज रविवारीही प्रचंड तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला आहे, मात्र म्हणावी तितकी ठोस पावले उचलली गेलेली नाहीत त्यामुळे दोन दिवसांनंतरही वातावरण तापलेलेच आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्तारोका केला. एसटी महामंडळाच्या काही गाड्या जाळण्यात आल्या, तर काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठिकठिकाणी बस थांबवून नुकसान करण्यात आले. आतापर्यंत १९ गाड्यांची जाळपोळ झाली आहे. महामंडळाला यामुळे अंदाचे ४ कोटींचे नुकसान झाले आहे.



काही बस फेऱ्या करण्यात आल्या रद्द


राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांची निदर्शने सुरु आहेत. मुंबईमध्ये देखील मराठा आंदोलक निदर्शने करणार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करत आज सकाळी दहा ते अकरा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा इशारा देण्यात आल्याचीही माहिती आहे.


या गरम वातावरणामुळे व झालेल्या नुकसानामुळे एसटी महामंडळाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. जालन्यासह नांदेड जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यातील बस फेऱ्यांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. रविवारीही मराठा आंदोलकांचा संताप कायम असल्याने बस स्थानकांमधून कमी गाड्या बाहेर काढल्या जाण्याची शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक