India Sun Mission : आदित्य एल-१ चे यशस्वी उड्डाण!

भारताची पहिली सूर्यमोहिम


श्रीहरिकोटा : भारताने आपलं महत्त्वपूर्ण चांद्रयान मिशन (Chandrayaan Mission) यशस्वी केलं. ही घटना कधीही न विसरता येण्यासारखी आहे. या घटनेचा आनंद आपण साजरा करत असतानाच भारताने नवी सूर्यमोहिम देखील हाती घेतली. भारताच्या या पहिल्या सौर मोहिमेचे यशस्वी उड्डाण आज पार पडले. आज सकाळी ११:५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून आदित्य एल-१ हे यान प्रक्षेपित करण्यात आले. इस्त्रोच्या पीएसएलव्ही एक्सएल (PSLV XL) या रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल-१ मिशन सूर्याच्या दिशेनं झेपावले आहे. भारताच्या या आदित्य एल-१ मिशनचा प्रमुख हेतू हा अंतराळातून सूर्यावरील घडामोडींचं निरीक्षण करणं हा आहे.


२००८ सालापासून सौर मोहिमेसाठी भारत प्रयत्न करत आहे. आपण चंद्रावर तापमान काही प्रमाणात अनुकूल असल्याने यान लँड करु शकलो. मात्र, सूर्यावर यान लँड करणे सध्या तरी शक्य नाही. याआधी काही देशांनी सूर्याच्या अत्यंत जवळ यान पाठवून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, मात्र सूर्याच्या प्रचंड तापमानामुळे ही याने जळून खाक झाली. भारताचे सूर्याच्या अभ्यासासाठीचे हे पहिलेच पाऊल आहे. याचे उड्डाण यशस्वी झाले असले तरी मधले १५ लाख किमी अंतर कापण्यासाठी आदित्य एल-१ ला जवळजवळ १२७ दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामध्ये अनेक अडचणी येण्याचीही शक्यता आहे.



इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (S. Somnath) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉन्चिंगनंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य एल-१ या अंतराळयानाला एल-१ बिंदूवर घेऊन जाईल. एल-१ हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच १५ लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर १५ लाख कोटी किलोमीटर आहे. आदित्य एल-१ मिशन ही सूर्याचं निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे.



सौर मोहिमेचे उद्दिष्ट काय?


आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करणारी आणि सूर्याची रहस्ये उलगडणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम आहे. आदित्य एल-१ मिशन पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतर कापेल, जे चंद्रापेक्षा चार पट जास्त आहे. आदित्य एल-१ मोहिमेचे उद्दिष्ट सूर्याचे कोरोनल हीटिंग आणि सौर पवन प्रवेग समजून घेणे, सौर वातावरणाची गतिशीलता, सौर वाऱ्याचे वितरण आणि तापमान समजून घेणे आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणं हाच इस्रोच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

सिक्कीममध्ये हिमवृष्टी! झारखंड आणि उत्तर बंगालमध्ये अतीवृष्टी होण्याची शक्यता, खराब वातावरणामुळे अर्थमंत्र्यांनी रद्द केला भूतान दौरा

सिक्कीम: भारत-चीन सीमेवर झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील तापमानात मोठी घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे

'शीशमहल' वाद आता चंदीगडमध्ये! भाजप-आपमध्ये तुफान जुंपली; स्वाती मालीवाल यांनीही केली केजरीवालांवर टीका

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आता 'आप'चे (AAP) संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी चंदीगडमध्ये 'शीशमहल' (Sheesh Mahal)

Beaver Moon : खगोलप्रेमींनो तयारी करा! सुपरमून पृथ्वीच्या २८,००० किमी जवळ येणार; 'या' तारखेला पाहा हा अद्भुत नजारा!

खगोलप्रेमींसाठी (Astronomy Enthusiasts) या नोव्हेंबर महिन्यात एक आनंदाची आणि खास खगोलीय घटना घडणार आहे. या महिन्यातील

मोंथा चक्रीवादळाचे १२ बळी

अनेक भागात पूरसदृश स्थिती तेलंगणा : मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे

भारत - अमेरिकेत १० वर्षांचा संरक्षण करार

क्वालालंपूर : भारत आणि अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षांसाठी सहकार्य वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

दिल्ली विमानतळावर भारतीय महिलेकडे मिळाला ९७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा!

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील महिला प्रवाशांनी गांजा तस्करी