INDIA Alliance Meeting: मुंबईत इंडिया आघाडीची बैठक, लोगो होणार जाहीर

मुंबई: इंडिया आघाडीने (india alliance) मुंबईत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीबाबतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बैठक आज ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला (गुरुवार आणि शुक्रवार) मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत आहे. बुधवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती देण्यात आली.


या कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीत सामील असलेले राजकीय पक्षाचे नेते मुंबईत पोहोचतील. संध्याकाळी ६ ते साडेसहा वाजता पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर साडेसहा वाजता सर्व नेता अनौपचारिक बैठक करतील. ३१ ऑगस्टला रात्री आठ वाजता डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.



जाहीर होणार आघाडीचा लोगो


इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे. याआधी १.१५ वाजता आघाडीचे नेते ग्रुप फोटो सेशन करतील. यानंतर बैठक सुरू होईल. ही बैठक दोन वाजेपर्यंत सुरू राहील. बैठक सुरू होण्याआधी आघाडीचा लोगो जाहीर केला जाईल.



बैठकीत पोहोचणार ५ मुख्यमंत्री, ८० नेते


इंडिया आघाडीच्या या मुंबई बैठकीत ५ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २६ पक्षांचे साधारण ८० नेते पोहोचण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी पोहोचण्याची शक्यता आहे.



या मुद्द्यांवर चर्चा


इंडिया आघाडीच्या या बैठकीत निवडणुकीसाठीची रणनीती, लोगो, जागावाटपाचा फॉर्म्युला तसेच किमान समान कार्यक्रम यावर चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
Comments
Add Comment

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या