INDIA Alliance Meeting: मुंबईत इंडिया आघाडीची बैठक, लोगो होणार जाहीर

मुंबई: इंडिया आघाडीने (india alliance) मुंबईत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीबाबतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही बैठक आज ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला (गुरुवार आणि शुक्रवार) मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत आहे. बुधवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही माहिती देण्यात आली.


या कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीत सामील असलेले राजकीय पक्षाचे नेते मुंबईत पोहोचतील. संध्याकाळी ६ ते साडेसहा वाजता पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. यानंतर साडेसहा वाजता सर्व नेता अनौपचारिक बैठक करतील. ३१ ऑगस्टला रात्री आठ वाजता डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.



जाहीर होणार आघाडीचा लोगो


इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी म्हणजेच १ सप्टेंबरला होणार आहे. याआधी १.१५ वाजता आघाडीचे नेते ग्रुप फोटो सेशन करतील. यानंतर बैठक सुरू होईल. ही बैठक दोन वाजेपर्यंत सुरू राहील. बैठक सुरू होण्याआधी आघाडीचा लोगो जाहीर केला जाईल.



बैठकीत पोहोचणार ५ मुख्यमंत्री, ८० नेते


इंडिया आघाडीच्या या मुंबई बैठकीत ५ राज्यांचे मुख्यमंत्री आणि २६ पक्षांचे साधारण ८० नेते पोहोचण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी पोहोचण्याची शक्यता आहे.



या मुद्द्यांवर चर्चा


इंडिया आघाडीच्या या बैठकीत निवडणुकीसाठीची रणनीती, लोगो, जागावाटपाचा फॉर्म्युला तसेच किमान समान कार्यक्रम यावर चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा