vande bharat: शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

मुंबई: गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. यातच मुंबईहून शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही सुरू करण्यात आली आहे. आता शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे.


सीएसएमटी-शिर्डी वंदे भारतचा वेग वाढवून लवकरच १३० किमी प्रति तास करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून वंदे भारतचा वेग ८३ किमी प्रति तास इतका आहे. अनेक रेल्वे ट्रॅकची स्थिती इतकी चांगली नाही की वंदे भारत आपल्या १६० किमी प्रति तास वेगाने धावू शकेल.


रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने वंदे भारतचा वेग वाढवण्यासाठी ट्रॅकच्या सुधारणेचे काम सुरू केले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा प्रवासातील अर्ध्या तासाचा वेळ वाचेल. यामुळे इगतपुरी-भुसावळ या अन्य रेल्वेंनाही याचा फायदा होईल.


मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस २२२२३ छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि साईनगर शिर्डी टर्मिनस या दरम्यान चालवली जाते. ही ट्रेन ११.४० मिनिटांनी सीएसटी येथून निघते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी हा प्रवास ५ तास २० मिनिटांचा आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान ५ स्थानके आहेत. हा प्रवास ३४३ किमीचा आहे.


Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला