मुंबई: गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. यातच मुंबईहून शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही सुरू करण्यात आली आहे. आता शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे.
सीएसएमटी-शिर्डी वंदे भारतचा वेग वाढवून लवकरच १३० किमी प्रति तास करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून वंदे भारतचा वेग ८३ किमी प्रति तास इतका आहे. अनेक रेल्वे ट्रॅकची स्थिती इतकी चांगली नाही की वंदे भारत आपल्या १६० किमी प्रति तास वेगाने धावू शकेल.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने वंदे भारतचा वेग वाढवण्यासाठी ट्रॅकच्या सुधारणेचे काम सुरू केले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा प्रवासातील अर्ध्या तासाचा वेळ वाचेल. यामुळे इगतपुरी-भुसावळ या अन्य रेल्वेंनाही याचा फायदा होईल.
मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस २२२२३ छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि साईनगर शिर्डी टर्मिनस या दरम्यान चालवली जाते. ही ट्रेन ११.४० मिनिटांनी सीएसटी येथून निघते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी हा प्रवास ५ तास २० मिनिटांचा आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान ५ स्थानके आहेत. हा प्रवास ३४३ किमीचा आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…