vande bharat: शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर

मुंबई: गेल्या काही महिन्यांत देशभरातील विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. यातच मुंबईहून शिर्डीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेसही सुरू करण्यात आली आहे. आता शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे.


सीएसएमटी-शिर्डी वंदे भारतचा वेग वाढवून लवकरच १३० किमी प्रति तास करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून वंदे भारतचा वेग ८३ किमी प्रति तास इतका आहे. अनेक रेल्वे ट्रॅकची स्थिती इतकी चांगली नाही की वंदे भारत आपल्या १६० किमी प्रति तास वेगाने धावू शकेल.


रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने वंदे भारतचा वेग वाढवण्यासाठी ट्रॅकच्या सुधारणेचे काम सुरू केले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा प्रवासातील अर्ध्या तासाचा वेळ वाचेल. यामुळे इगतपुरी-भुसावळ या अन्य रेल्वेंनाही याचा फायदा होईल.


मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस २२२२३ छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि साईनगर शिर्डी टर्मिनस या दरम्यान चालवली जाते. ही ट्रेन ११.४० मिनिटांनी सीएसटी येथून निघते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी हा प्रवास ५ तास २० मिनिटांचा आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान ५ स्थानके आहेत. हा प्रवास ३४३ किमीचा आहे.


Comments
Add Comment

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला

Mankhurd News : मानखुर्दमधील १४०० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

बॉम्बे सोप फॅक्टरीच्या जागेवरील अतिक्रमणाचा डाव हाणून पडला महानगरपालिका आणि उपनगरे जिल्हाधिकारी कार्यालय

BMC News : ओसीविना इमारतींसाठी अभय योजनेचा प्रस्ताव निर्णयाविना..

उबाठाला विकासक दिसतात, तर महायुतीला फसवणूक झालेले रहिवाशी मुंबई : मुंबईत आज मोठ्याप्

Bmc News : गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प कामामुळे गोरेगावकर त्रस्त; भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी मांडल्या जनतेच्या व्यथा

प्रकल्प कामात रस्ते सुरक्षेसह पर्यावरण आणि आरोग्याचा मुद्दा बनतो जटील मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने हाती

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या