कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून होणार साजरा - मुख्यमंत्री

  105

मुंबई: भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे अशी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची ओळख आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून जगात नाव केले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आजही केले जाते.


खाशाबा जाधव यांच्या या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रालाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.


शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली. हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत त्यांनी १९५२मध्ये हेलसिंकी येथील ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठीचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा करतो.


दरम्यान, खेळाडूंच्या पुरस्कारांची रक्कम वाढवण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. या मागण्यादेखील मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची रक्कम १ लाखावरून ३ लाख तसेच ३ लाखावरून ५ लाख करण्यात आली आहे. यावेळी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने नाव उंचावणाऱ्या नीरज चोप्राचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

Comments
Add Comment

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि

पालिकेच्या भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' तंत्रज्ञ!

मुंबई : एका माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नातून असे उघड झाले आहे की, मुंबईतील भाभा रुग्णालयात १३ 'बोगस' प्रयोगशाळा

आता मुंबईतही भटक्या कुत्र्यांची तक्रार तीन वेळा घेतली जाणार!

अखेर पालिका प्रशासनाला जाग! मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींवर आठवड्यातून

स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्री बंदीवरून आदित्य आणि जितेंद्र आव्हाडांची पुराव्यासकट भाजपने केली बोलती बंद!

तेव्हा जिभेवर कुलूप, तोंड उघडण्यापूर्वी निर्णय वाचून घ्या; भाजप नेते नवनाथ बन यांचे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र

IAS Transferred: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

Kabutarkhana: दादरमध्ये नवा कबुतरखाना! कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवत जैन मंदिराशेजारील इमारतीच्या छतावर कबुतरांसाठी सोय

मुंबई: कबुतरखाना बंद करण्यावरून दादर येथे मोठा वाद सुरू आहे. हा वाद कोर्टाच्या निर्णयानंतरही थांबलेला नाही,