कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून होणार साजरा - मुख्यमंत्री

  103

मुंबई: भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे अशी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची ओळख आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून जगात नाव केले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आजही केले जाते.


खाशाबा जाधव यांच्या या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रालाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.


शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली. हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत त्यांनी १९५२मध्ये हेलसिंकी येथील ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठीचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा करतो.


दरम्यान, खेळाडूंच्या पुरस्कारांची रक्कम वाढवण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. या मागण्यादेखील मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची रक्कम १ लाखावरून ३ लाख तसेच ३ लाखावरून ५ लाख करण्यात आली आहे. यावेळी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने नाव उंचावणाऱ्या नीरज चोप्राचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर