कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून होणार साजरा - मुख्यमंत्री

मुंबई: भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे अशी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची ओळख आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून जगात नाव केले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आजही केले जाते.


खाशाबा जाधव यांच्या या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रालाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.


शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली. हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत त्यांनी १९५२मध्ये हेलसिंकी येथील ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठीचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा करतो.


दरम्यान, खेळाडूंच्या पुरस्कारांची रक्कम वाढवण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. या मागण्यादेखील मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची रक्कम १ लाखावरून ३ लाख तसेच ३ लाखावरून ५ लाख करण्यात आली आहे. यावेळी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने नाव उंचावणाऱ्या नीरज चोप्राचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :