कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून होणार साजरा - मुख्यमंत्री

मुंबई: भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे अशी कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची ओळख आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून जगात नाव केले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक आजही केले जाते.


खाशाबा जाधव यांच्या या कामगिरीचा गौरव महाराष्ट्रालाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.


शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी ही घोषणा केली. हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातील सुपुत्र आहेत त्यांनी १९५२मध्ये हेलसिंकी येथील ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठीचे पहिले वैयक्तिक पदक जिंकले. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा करतो.


दरम्यान, खेळाडूंच्या पुरस्कारांची रक्कम वाढवण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. या मागण्यादेखील मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची रक्कम १ लाखावरून ३ लाख तसेच ३ लाखावरून ५ लाख करण्यात आली आहे. यावेळी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने नाव उंचावणाऱ्या नीरज चोप्राचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

Comments
Add Comment

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.