World Cupसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा, तारीख ठरली

नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेसाठी (asia cup) भारतीय संघाने (indian team) कंबर कसून तयारी केली आहे. मात्र संघाचे खरे मिशन आहे ते म्हणजे वर्ल्डकप (world cup). वर्ल्डकपसाठी सर्व संघांच्या क्रिकेट बोर्डना सप्टेंबरपर्यंत आपले संघ जाहीर करायचे आहेत.


भारतीय संघात सध्याच्या घडीला काही खेळाडूंबाबत सातत्याने साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडू वर्ल्डकपसाठी आपापले संघ जाहीर करत आहेत. मात्र चाहत्यांना भारतीय संघाची प्रतीक्षा आहे. यासाठी दोन तारखा समोर आल्या आहेत जेव्हा क्रिकेट मंडळ या मोठ्या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करू शकतो.


असे मानले जात आहे की जो संघ आशिया कपसाठी निवडण्यात आला आहे तोच संघ वर्ल्डकपमध्ये विरोधकांना टक्कर देईल. मात्र केएल राहुल, श्रेयस अय्यर हे खेळाडू नुकतेच दुखापतीतून सावरत आहेत. दोघांना सरळ आशिया चषकमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याआधी ते एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत.


त्यामुळे त्यांचा खेळ न पाहता वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करणे हे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. याशिवाय काही खेळाडूंबाबत साशंकता आहे. हे पाहता ३ अथवा ४ सप्टेंबरला बीसीसीआयकडून वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली जाऊ शकते



भारत-पाकिस्तान सामना महत्त्वाचा


भारतीय संघाचा आशिया चषकाच्या सुरूवातीलाच पाकिस्तानशी सामना रंगणार आहे. या सामन्याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेच्या पल्लेकल स्टेडियममध्ये रंगणार आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील