Jay Pawar : अजितदादांचे पुत्र जय पवार पाहतायत दादांच्या सिग्नलची वाट; राजकारणात होणार का सक्रिय?

काय म्हणाले जय पवार?


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड केल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. काहीजणांनी अजितदादांसोबत सरकारची साथ दिली तर काहीजणांनी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) राहणे पसंत केले. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून आता राष्ट्रवादीचे भविष्य काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, अजितदादांचे दोन्ही पुत्र आता राजकारणात उतरण्याची चिन्हे देखील निर्माण झाली आहेत. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे तर राजकारणात सक्रिय होतेच मात्र आता जय पवार (Jay Pawar) देखील मैदानात उतरण्याच्या मार्गावर आहेत. 'तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी मला सिग्नल दिला की, मी लगेच तयार आहे,' असं विधान करत त्यांनी त्यांच्या एण्ट्रीचा संकेतच दिला आहे.


बारामतीत शनिवारी अजितदादांच्या झालेल्या जाहीर सभेत त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील होते. त्यानंतर आज जय पवार बारामतीत आले होते. त्यांनी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व कार्यालयाची पाहणी केली. महिला कार्यकर्त्यांनी जय पवार यांचं औक्षण करत त्यांचं स्वागत केलं. यावेळी मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, असं जय पवार म्हणाले.


जय पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संवाद साधत असताना 'दादा तुम्ही आता बारामतीत ऍक्टिव्ह व्हायला हवे, आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यामुळे तुम्ही आता बारामतीत यायला पाहिजे', असा प्रेमळ आग्रह बारामतीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यासंदर्भात तुम्ही अजितदादांना विचारा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला लागतो, असं उत्तर जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं. त्यांच्या या उत्तरामुळे जय पवारही लवकरच राजकारणात दिसणार असा संकेत मिळाला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा