Mumbai-Goa Highway : मंत्र्यांचे आदेश डावलून मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बिनबोभाट सुरुच

मुंबई : गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मुंबई- गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्डे काही बुजवता येत नाहीत. हे खड्डे लवकरात लवकर बुजवून किमान एकेरी मार्गावरील वाहतूक १० सप्टेंबर पर्यंत सुरु करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खड्डे बुजवताना अडथळे येऊ नयेत यासाठी २७ ऑगस्टपासून या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजही मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बिनबोभाट सुरुच असल्याचे दिसून येते.


?si=ZiJfcvx4IHNMuzNU

गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून २७ ऑगस्टपासून अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. अवजड वाहनांमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच गणपतीच्या आधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण व्हावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चव्हाण यांनी शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथे महामार्गाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.


बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका