Mumbai-Goa Highway : मंत्र्यांचे आदेश डावलून मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बिनबोभाट सुरुच

  302

मुंबई : गणेशोत्सव (ganeshostav) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र मुंबई- गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खड्डे काही बुजवता येत नाहीत. हे खड्डे लवकरात लवकर बुजवून किमान एकेरी मार्गावरील वाहतूक १० सप्टेंबर पर्यंत सुरु करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खड्डे बुजवताना अडथळे येऊ नयेत यासाठी २७ ऑगस्टपासून या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजही मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बिनबोभाट सुरुच असल्याचे दिसून येते.


?si=ZiJfcvx4IHNMuzNU

गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून २७ ऑगस्टपासून अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. अवजड वाहनांमुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. तसेच गणपतीच्या आधी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण व्हावी यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चव्हाण यांनी शनिवारी, २६ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील पळस्पे येथे महामार्गाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.


बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाण्याचे निर्देश देण्यात आले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी