आशिया चषकाआधी पाकिस्तानला मिळाली गुडन्यूज

आशिया कपआधी पाकिस्तानची धमाल, एकदिवसीय क्रमवारीत अव्वल, टीम इंडिया कुठे?


कोलंबो : पाकिस्तानने ३ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामन्यात अफगाणिस्तानला ५९ धावांनी हरवत मालिका ३-० अशी आपल्या नावे केली. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या समोर अफगाणिस्तानचा संघ पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही.


अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त यश मिळवल्याने त्याचा फायदा पाकिस्तानच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मिळाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानचा वनडे संघ या क्रमवारीत अव्वल ठरला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियालाही मागे टाकले. भारतीय संघ ११३ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.


आशिया कपआधी पाकिस्तानला मिळालेले हे मोठे यश आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळाल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. पाकिस्तानने या वर्षात ११ एकदिवसीय सामने खेळलेत. यापैकी ८ सामन्यांत त्यांना विजय मिळाला आहे. त्यांनी मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका १-२ अशी गमावली होती. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडला ४-१ अशी मात दिली. टी-२० क्रमवारीत पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे तर कसोटी क्रमवारीत पाकिस्तान सहाव्या स्थानी आहे.



पाकिस्तान अव्वल


अफगाणिस्तानविरुद्ध मालिका विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा संघ ११८.४८ रेटिंग गुणासह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी पाकिस्तानचा संघ ११५.८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर होता तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर होता.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात