MNS: मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत झाल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही, बाळा नांदगावकरांचा निर्धार

Share

पेण : गेली १३ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग (mumbai-goa highway) सुरळीत झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (maharashtra navnirman sena) स्वस्त बसणार नाही असा निर्धार माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मुंबई गोवा महामार्गावरील तरणखोप-पेण-खारपले येथील जागर यात्रेत केला आहे. एकूण आठ टप्प्यात ही जागर यात्रा आयोजित करण्यात आली होती.

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम होण्याकरिता व सरकारला जाग आणण्यासाठी मनसेने रविवारी युवा नेते अमित राज ठाकरे आणि माजी गृहमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते कोलाड जागर पायी यात्रा सुरू केली. या यात्रेत मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी शेकडोच्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने अनेक नागरिकांनी आणि विविध संघटनांनीही या जागर यात्रेत सहभाग घेतला होता.

पेण तालुक्यातील तरणखोप येथून सुरू झालेल्या या जागर यात्रेत बाळा नांदगावकर यांनी सांगितले की कोकण हा महत्त्वाचा पर्यटन स्थळ असून गेली अनेक वर्ष या कोकणामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना या महामार्गाच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत असून गेली १३ वर्ष आणि कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही हा रस्ता होत नाही. या महामार्गाने आजतागायत अनेकांचे जीव गेले आहेत. कुटुंब उध्वस्त झाली मात्र रस्त्याची दुरावस्था जैसे थे आहे. आजपर्यंत अनेक पक्षाचे सरकार बसले परंतु महामार्गाची व्यथा संपतच नाही. त्यामुळे कोकणवाशींच्या करीता मनसे रस्त्यावर उतरली आहे. जो पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत होत नाही, तोपर्यंत मनसे स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवीला.

दरम्यान, महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एक मार्ग बंद करण्यात आला आहे. एकाच मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्याने त्यातच मोठ मोठाले खड्डे असल्याने दहा ते बारा किलोमीटर लांब पर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. यावेळी युवा नेते अमित राज ठाकरे यांनी पळस्पे ते खारपाडा आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पेण तरणखोप ते खारपाले अशी पदयात्रा केली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, शालोम पेणकर, जनार्दन पाटील, नागेश गावंड, सुदेश संसारे, महिला आघाडीच्या सपना देशमुख, अनिशा गावंड, अमेय पाटील आदिंसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts

रेणुका माता छात्रावास, चिपळूण

सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…

3 hours ago

मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…

6 hours ago

रोहित शर्माने टी-२०मधून निवृत्ती घेतल्यानंतर बदलला प्रोफाईल फोटो, मिलियनहून अधिक लाईक्स

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…

7 hours ago

देशात ११३ वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यास मान्यता

महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…

7 hours ago

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

8 hours ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

8 hours ago