MNS: मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत झाल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही, बाळा नांदगावकरांचा निर्धार

पेण : गेली १३ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग (mumbai-goa highway) सुरळीत झाल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (maharashtra navnirman sena) स्वस्त बसणार नाही असा निर्धार माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी मुंबई गोवा महामार्गावरील तरणखोप-पेण-खारपले येथील जागर यात्रेत केला आहे. एकूण आठ टप्प्यात ही जागर यात्रा आयोजित करण्यात आली होती.


रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम होण्याकरिता व सरकारला जाग आणण्यासाठी मनसेने रविवारी युवा नेते अमित राज ठाकरे आणि माजी गृहमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते कोलाड जागर पायी यात्रा सुरू केली. या यात्रेत मनसेचे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी शेकडोच्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने अनेक नागरिकांनी आणि विविध संघटनांनीही या जागर यात्रेत सहभाग घेतला होता.


पेण तालुक्यातील तरणखोप येथून सुरू झालेल्या या जागर यात्रेत बाळा नांदगावकर यांनी सांगितले की कोकण हा महत्त्वाचा पर्यटन स्थळ असून गेली अनेक वर्ष या कोकणामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना या महामार्गाच्या दुरावस्थेचा सामना करावा लागत असून गेली १३ वर्ष आणि कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही हा रस्ता होत नाही. या महामार्गाने आजतागायत अनेकांचे जीव गेले आहेत. कुटुंब उध्वस्त झाली मात्र रस्त्याची दुरावस्था जैसे थे आहे. आजपर्यंत अनेक पक्षाचे सरकार बसले परंतु महामार्गाची व्यथा संपतच नाही. त्यामुळे कोकणवाशींच्या करीता मनसे रस्त्यावर उतरली आहे. जो पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग सुरळीत होत नाही, तोपर्यंत मनसे स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवीला.


दरम्यान, महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एक मार्ग बंद करण्यात आला आहे. एकाच मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्याने त्यातच मोठ मोठाले खड्डे असल्याने दहा ते बारा किलोमीटर लांब पर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. यावेळी युवा नेते अमित राज ठाकरे यांनी पळस्पे ते खारपाडा आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पेण तरणखोप ते खारपाले अशी पदयात्रा केली.


यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, शालोम पेणकर, जनार्दन पाटील, नागेश गावंड, सुदेश संसारे, महिला आघाडीच्या सपना देशमुख, अनिशा गावंड, अमेय पाटील आदिंसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात