Moon South pole temperature : चांद्रयानाने पाठवली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमानाची माहिती

Share

जाणून घ्या किती तापमान…

बंगळुरु : भारताने अद्वितीय अशी कामगिरी करत चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिम यशस्वी केली. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर आता मुख्य कामाला सुरुवात झाली आहे. यासंबंधीची सर्व माहिती इस्रो (ISRO) सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. नुकतेच विक्रमच्या ChaSTE पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे तापमान मोजले आहे व त्याची प्राथमिक माहिती पाठविली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केलेली ही पहिली तपासणी आहे. असे करणारा भारत हा पहिला देश आहे. माहितीचा सविस्तर अभ्यास सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

इस्रोने शेअर केलेल्या आलेखानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे ५० अंश सेल्सिअस आहे. खोलवर गेल्यावर तापमान झपाट्याने घसरते. ८० मिमीच्या आत गेल्यानंतर, तापमान -१० अंशांपर्यंत खाली येते. सूर्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर क्षितिजाच्या खाली किंवा वर फिरतो, त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या वेळी तापमान १३० °F (५४°C) पेक्षा जास्त होते. शास्त्रज्ञांच्या मते, प्रकाशाच्या या काळातही, उंच पर्वतावर काळ्या सावल्या पडतात. काही खड्डे कायमस्वरूपी सावली असलेल्या भागात आहेत ज्यांनी अब्जावधी वर्षांमध्ये दिवसाचा प्रकाश पाहिला नाही, तेथे तापमान −३३४°F ते −४१४°F (−२०३°C ते −२४८°C) पर्यंत असते.

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. दक्षिण ध्रुवावरील चंद्राचा पृष्ठभाग, पर्वत आणि दऱ्यांमुळे अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि मोजणीतील थोडीशी चूक देखील लँडर मोहीम अयशस्वी होऊ शकते. त्याचबरोबर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून काढत असलेले फोटो इस्रोच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल, अशीही माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, ISRO यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांच्या ग्राउंड स्टेशनची मदत घेत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर वातावरण नसल्यामुळे सर्व सावल्या गडद दिसत आहेत आणि त्यामुळे स्पष्ट फोटो मिळणे कठीण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

29 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

29 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

31 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

44 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

48 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago