मुंबईच्या गॅलेक्सी हॉटेलला आग, ३ जणांचा मृत्यू, ५ जखमी

  92

मुंबई: मुंबईच्या सांताक्रुझ (santacruz) येथील गॅलेक्सी हॉटेलमध्ये (galaxy hotel) रविवारी आग लागली. आगीचे लोळ पाहून तेथील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीमध्ये होरपळून आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण जखमी झालेत. अग्निशमन दलाच्या विभागाने लगेचच तेथे धाव घेतली आणि हॉटेल खाली करण्यास सांगितले.


दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आग लागण्याची सूचना मिळताच हॉटेलमध्ये एकच गदारोळ झाला. हॉटेल स्टाफने पटापट हॉटेल खाली केले. सूचना मिळताच त्या ठिकाणी पोहोचलेल्या फायर ब्रिगेडच्या गाडीने बऱ्याच मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत होरपळलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
हॉटेलमध्ये कोणत्या कारणाने आग लागची याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.



इलेक्ट्रिक वायरमध्ये ठिणगी उडाल्याने लागली आग


गॅलॅक्सी हॉटेलमध्ये आग लागण्याचे कारण इलेक्ट्रिक वायरमध्ये ठिणगी उडाल्याने सांगितले जात आहे. वायरमध्ये ठिणगी उडाल्याने हॉटेलच्या रूम नंबर १०३ आणि २०३मध्ये भीषण आग लागली. सूचना मिळताच त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी हॉटेलमधील लोकांना तात्काळ बाहेर काढले. या तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला.





मुंबई फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार आग हॉटेलच्या रूम नंबर १०३ आणि २०३ मध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, स्प्लिट एसी युनिट, पडदे-गाद्या, लाकडाच्या फर्निचरला आग लागली होती. याशिवाय इलेक्ट्रिक डक्ट आणि लाँड्री रूम, शिडी, लॉबी आणि पहिल्या ते चौथ्या मजल्यापर्यंत आगपसरली होती.



मदुरैमध्ये ट्रेनच्या डब्ब्यात आग लागल्याने गदारोळ


काही दिवसांआधी तामिळनाडूच्या मदुरै रेल्वे स्टेशनजवळ आग लागल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मदुरैमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लखनऊ येथून रामेश्वर जाणाऱ्या ट्रेनच्या खासगी कोचमध्ये आग लागल्याने १० लोकांचा मृत्यू झाला होता तर २० जण जखमी झाले होते.



जुने आहे हे प्रकरण


रेल्वे या प्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाख रूपये मदतीची घोषणा केली होती. प्रायव्हेट पार्टी कोचने १७ ऑगस्टला लखनऊ येथून आपला प्रवास सुरू केला होता आणि चेन्नईला पोहोचणार होते. यानंतर ते तेथून लखनऊला परतणार होते.


अधिकाऱ्यांच्या मते, आग लागण्याच्या घटनेची सूचना साधारण सकाळी ५.१५ मिनिटांनी मिळाली. त्यावेळेस मदुरै यार्ड जंक्शनवर थांबली होती. रेल्वेच्या माहितीनुसार काही प्रवासी अवैध पद्धतीने गॅस सिलेंडर घेऊन प्रायव्हेट पार्टी कोचमध्ये घुसले होते.

Comments
Add Comment

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची