Food poisoning in Bhandara : भंडार्‍यातील आश्रमशाळेत ४१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

४ जणांची प्रकृती गंभीर


भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील (Ashram School) ४१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food poisoning) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथील शाळेत हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.


उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर रात्री उशिरा ३६ विद्यार्थ्यांना तुमसर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आणखी पाच जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे आता उपचार घेणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात २३ तर तुमसर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.


भंडारा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने यासंबंधी सविस्तर माहिती दिली. तिने सांगितल्यानुसार, काल वर्गात गेल्यावर मुलांनी वाटाणा, चणा आणि बटाट्याची भाजी खाल्ली. त्यानंतर काही जणांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला व त्यांनी शिक्षकांना याबद्दल माहिती दिली. त्यामुळे मुलांना ताबडतोब रुग्णालयात आणून उपचार सुरु करण्यात आले.


दरम्यान, रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता वाघमारे यांनी मुलांना योग्य ते उपचार देण्यात येत आहेत, तसेच ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना इमर्जन्सी सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा

Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार मुंबई : राज्याच्या प्रशास