Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण कार अपघातात ४ ठार, ६ जखमी

मोहोळ : ईको कारला अज्ञात वाहनाने समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) चार जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे साडेचार वाजता सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील यावली गावच्या नजीक घडला. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


या अपघातात आदमअली मुनावरअली शेख (वय- ३७), हिराबाई रामदास पवार (वय -७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय- ६०), द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय – ४०) (सर्व रा. राजनगाव मशीद, ता. पारनेर जि. अहमदनगर) या चार जणांचा मृत्यू झाला. तर बाळी बाबु पवार (वय-२७), छकुली भिमा पवार (वय – २७), साई योगीराज पवार (वय -७), मंदाबाई नाथा पवार (वय -५२), सुरेखा भारत मोरे (वय- ४५), बायजाबाई रामदास पवार (वय -६०) (सर्व रा. राजनगाव मशीद) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सोलापूर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी