Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण कार अपघातात ४ ठार, ६ जखमी

मोहोळ : ईको कारला अज्ञात वाहनाने समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) चार जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे साडेचार वाजता सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील यावली गावच्या नजीक घडला. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


या अपघातात आदमअली मुनावरअली शेख (वय- ३७), हिराबाई रामदास पवार (वय -७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय- ६०), द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय – ४०) (सर्व रा. राजनगाव मशीद, ता. पारनेर जि. अहमदनगर) या चार जणांचा मृत्यू झाला. तर बाळी बाबु पवार (वय-२७), छकुली भिमा पवार (वय – २७), साई योगीराज पवार (वय -७), मंदाबाई नाथा पवार (वय -५२), सुरेखा भारत मोरे (वय- ४५), बायजाबाई रामदास पवार (वय -६०) (सर्व रा. राजनगाव मशीद) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सोलापूर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी