Asia Cup: आशिया कपच्या संघनिवडीवर गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने आशिया कप २०२३साठी (asia cup 2023) भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया कप २०२३ पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंका (srilanka) या देशात खेळवला जाणार आहे. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर ही स्पर्धा रंगणार आहे.


आशिया कप २०२३मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला रंगणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने की भारताकडे आपल्या वनडे संघात चौथ्या स्थानासाठी फलंदाजांचे खूप पर्याय आहेत आणि केवळ एका स्थानावर लक्ष देऊन वर्ल्डकपसारख्या स्पर्धा जिंकता येत नाहीत. गांगुलीने सांगितले की समितीला एका खेळाडूला ठरवून त्याला चौथ्या स्थानासाठी संधी दिली पाहिजे.



आशिया कपबाबत गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया


भारतीय क्रिकेट मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, भारताकडे प्रचंड प्रतिभा आहे. मी अशा तक्रारी ऐकत आहे की आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही. मात्र आमच्याकडे खूप काही आहे आणि समस्या ही आहे की आपल्याला निर्णय घेता येत नाहीये. फलंदाजीत चौथ्या क्रमांकासाठी राहुल द्रविड, निवड समिती आणि रोहित शर्माने कोणत्याही एका खेळाडूला निवडून सातत्याने संधी दिली पाहिजे.



नंबर चार बाबत म्हणाला असं काही


गांगुलीने पुढे सांगितले, चौथा क्रमांक हा केवळ एक नंबर आहे आणि यात कोणीही फिट होऊ शकते. मी वनडे क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळण्यास सुरूवात केली आणि नंतर डावाची सुरूवात करू लागलो आणि त्यावेळेसचा तत्कालीन कर्णधार सचिन तेंडुलकरने असे सांगितले होते. सचिनसोबतही हेच झाले. तेंडुलकरने करिअरच्या सुरूवातीला सहाव्या स्थानावर फलंदाजी केली होती. जेव्हा त्याच्या कर्णधाराने त्याला डावाची सुरूवात करण्यास सांगितले तेव्हा तो जागतिक स्तराचा खेळाडू बनला. चौथ्या स्थानावर कोणीही खेळू शकतं तेथे विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुलसारखे खेळाडू आहेत.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील