Health : चांगल्या आरोग्यासाठी नाश्ता आणि जेवण यांच्यात किती असावे अंतर

मुंबई: सध्या वाढत्या आजारांमुळे बरेचजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. मात्र त्यातही अनेकांना सकाळचा नाश्ता आणि जेवणाच्या वेळेबाबत संभ्रम असतो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हे हेल्दी असले पाहिजे. मात्र दुपारच्या जेवणाबाबत अनेकजण बिनधास्त असतात. अनेकदा कामाचा वर्क लोड इतका असतो की काहीजण दुपारचे जेवण करणेच टाळतात. अथवा वेळेवर खातच नाहीत.


आरोग्य तज्ञांच्या मते तुम्हालाही ही सवय असेल तर लगेचच बदला. कारण या सवयीमुळे तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. भूक लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नका. जर तुम्ही सकाळी हेल्दी नाश्ता घेतला तर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि ४ ते ५ तास तुमच्या शरीरात एनर्जी राहते.



नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाची योग्य


आता जाणून घेऊया नाश्त्यानंतर जेवणाची योग्य वेळ कोणती असावी ते. जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता केला असेल तर दुपारी १ वाजेपर्यंत तुम्हाला दुपारचे जेवण घ्यावे लागेल. जर तुम्ही दुपारी १ वाजता जेऊ शकत नसाल तर सकाळी ८ वाजता नाश्ता केल्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा लंच करून घ्या.



वेगवेगळ्या वेळेस खाऊ नका


दुपारच्या जेवणाचे रूटीन सेट करा. नियमित वेळेत खाण्यास शिका. कधीही खात राहू नका. सकाळच्या ठराविक वेळेतच नाश्ता करा. त्यानंतर काही तासांनी दुपारचे जेवण घ्या.



दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर


दिवसभर काही ना काही खात राहू नका. जितके शक्य असेल तितके वेळेवर जेवण घ्या. दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर ठेवा. यामुळे शरीराला जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा

ऑनलाईन गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स गल्लत नको! महाराष्ट्र शासन लवकरच आणणार स्वतंत्र धोरण

मुंबई : महाराष्ट्र शासन राज्यातील वाढत्या ई-स्पोर्ट्स (E-Sports) क्षेत्रासाठी एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण आणणार

Loan waiver scheme : आणखी १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार

- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार निर्णय मुंबई : "पुण्यश्लोक

विलेपार्लेच्या जीवनतारा सोसायटीची फसवणूक; विकासकावर गुन्हा दाखल करण्याची विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई : विलेपार्ले येथील ६० वर्षे जुन्या असलेल्या 'जीवनतारा' सोसायटीच्या पुनर्विकासात विकासकाने

ससून डॉकचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन करण्यासाठी फिनलंडच्या प्रतिनिधींसोबत मंत्री नितेश राणे यांची चर्चा

मुंबई : मुंबईतील ससून डॉकच्या डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे