प्रहार    

Health : चांगल्या आरोग्यासाठी नाश्ता आणि जेवण यांच्यात किती असावे अंतर

  185

Health : चांगल्या आरोग्यासाठी नाश्ता आणि जेवण यांच्यात किती असावे अंतर

मुंबई: सध्या वाढत्या आजारांमुळे बरेचजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. मात्र त्यातही अनेकांना सकाळचा नाश्ता आणि जेवणाच्या वेळेबाबत संभ्रम असतो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हे हेल्दी असले पाहिजे. मात्र दुपारच्या जेवणाबाबत अनेकजण बिनधास्त असतात. अनेकदा कामाचा वर्क लोड इतका असतो की काहीजण दुपारचे जेवण करणेच टाळतात. अथवा वेळेवर खातच नाहीत.


आरोग्य तज्ञांच्या मते तुम्हालाही ही सवय असेल तर लगेचच बदला. कारण या सवयीमुळे तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. भूक लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नका. जर तुम्ही सकाळी हेल्दी नाश्ता घेतला तर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि ४ ते ५ तास तुमच्या शरीरात एनर्जी राहते.



नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाची योग्य


आता जाणून घेऊया नाश्त्यानंतर जेवणाची योग्य वेळ कोणती असावी ते. जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता केला असेल तर दुपारी १ वाजेपर्यंत तुम्हाला दुपारचे जेवण घ्यावे लागेल. जर तुम्ही दुपारी १ वाजता जेऊ शकत नसाल तर सकाळी ८ वाजता नाश्ता केल्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा लंच करून घ्या.



वेगवेगळ्या वेळेस खाऊ नका


दुपारच्या जेवणाचे रूटीन सेट करा. नियमित वेळेत खाण्यास शिका. कधीही खात राहू नका. सकाळच्या ठराविक वेळेतच नाश्ता करा. त्यानंतर काही तासांनी दुपारचे जेवण घ्या.



दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर


दिवसभर काही ना काही खात राहू नका. जितके शक्य असेल तितके वेळेवर जेवण घ्या. दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर ठेवा. यामुळे शरीराला जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

Comments
Add Comment

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची