Health : चांगल्या आरोग्यासाठी नाश्ता आणि जेवण यांच्यात किती असावे अंतर

मुंबई: सध्या वाढत्या आजारांमुळे बरेचजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. मात्र त्यातही अनेकांना सकाळचा नाश्ता आणि जेवणाच्या वेळेबाबत संभ्रम असतो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हे हेल्दी असले पाहिजे. मात्र दुपारच्या जेवणाबाबत अनेकजण बिनधास्त असतात. अनेकदा कामाचा वर्क लोड इतका असतो की काहीजण दुपारचे जेवण करणेच टाळतात. अथवा वेळेवर खातच नाहीत.


आरोग्य तज्ञांच्या मते तुम्हालाही ही सवय असेल तर लगेचच बदला. कारण या सवयीमुळे तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. भूक लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नका. जर तुम्ही सकाळी हेल्दी नाश्ता घेतला तर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि ४ ते ५ तास तुमच्या शरीरात एनर्जी राहते.



नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाची योग्य


आता जाणून घेऊया नाश्त्यानंतर जेवणाची योग्य वेळ कोणती असावी ते. जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता केला असेल तर दुपारी १ वाजेपर्यंत तुम्हाला दुपारचे जेवण घ्यावे लागेल. जर तुम्ही दुपारी १ वाजता जेऊ शकत नसाल तर सकाळी ८ वाजता नाश्ता केल्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा लंच करून घ्या.



वेगवेगळ्या वेळेस खाऊ नका


दुपारच्या जेवणाचे रूटीन सेट करा. नियमित वेळेत खाण्यास शिका. कधीही खात राहू नका. सकाळच्या ठराविक वेळेतच नाश्ता करा. त्यानंतर काही तासांनी दुपारचे जेवण घ्या.



दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर


दिवसभर काही ना काही खात राहू नका. जितके शक्य असेल तितके वेळेवर जेवण घ्या. दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर ठेवा. यामुळे शरीराला जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५