Health : चांगल्या आरोग्यासाठी नाश्ता आणि जेवण यांच्यात किती असावे अंतर

  168

मुंबई: सध्या वाढत्या आजारांमुळे बरेचजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. मात्र त्यातही अनेकांना सकाळचा नाश्ता आणि जेवणाच्या वेळेबाबत संभ्रम असतो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हे हेल्दी असले पाहिजे. मात्र दुपारच्या जेवणाबाबत अनेकजण बिनधास्त असतात. अनेकदा कामाचा वर्क लोड इतका असतो की काहीजण दुपारचे जेवण करणेच टाळतात. अथवा वेळेवर खातच नाहीत.


आरोग्य तज्ञांच्या मते तुम्हालाही ही सवय असेल तर लगेचच बदला. कारण या सवयीमुळे तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. भूक लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नका. जर तुम्ही सकाळी हेल्दी नाश्ता घेतला तर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि ४ ते ५ तास तुमच्या शरीरात एनर्जी राहते.



नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाची योग्य


आता जाणून घेऊया नाश्त्यानंतर जेवणाची योग्य वेळ कोणती असावी ते. जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता केला असेल तर दुपारी १ वाजेपर्यंत तुम्हाला दुपारचे जेवण घ्यावे लागेल. जर तुम्ही दुपारी १ वाजता जेऊ शकत नसाल तर सकाळी ८ वाजता नाश्ता केल्यानंतर दुपारी १२ ते २ दरम्यान जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा लंच करून घ्या.



वेगवेगळ्या वेळेस खाऊ नका


दुपारच्या जेवणाचे रूटीन सेट करा. नियमित वेळेत खाण्यास शिका. कधीही खात राहू नका. सकाळच्या ठराविक वेळेतच नाश्ता करा. त्यानंतर काही तासांनी दुपारचे जेवण घ्या.



दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर


दिवसभर काही ना काही खात राहू नका. जितके शक्य असेल तितके वेळेवर जेवण घ्या. दोन जेवणामध्ये ३ ते ५ तासांचे अंतर ठेवा. यामुळे शरीराला जेवण पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.