IND vs IRE : ही मोठी डोकेदुखी आहे, विजयानंतरही असं का म्हणाला बुमराह

डबलिन: आयर्लंड (ireland) आणि भारत (india) यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने (team india) अतिशय सहजपणे ३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने या ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये आधी फलंदाजांनी तर नंतर गोलंदाजांनी कमाल केली.


जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८५ धावा केल्या. यानंतर आयर्लंडच्या डावाला १५२ धावांवर रोखले. यासोबतच टीम इंडियाने या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवला. या मोठ्या विजयानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनेही मोठे विधान केले आहे.



ही सगळ्यात मोठी डोकेदुखी


आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने त्याच्यासाठी कोणती गोष्ट सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे याचा खुलासा केला. त्याने सांगितले सगळ्यात कठीण आहे अंतिम ११ची निवड करणे.


विजयानंतर बुमराह म्हणाला, मला चांगले वाटत आहे. हे खूपच शानदार आहे. मात्र सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे अंतिम ११ची निवड करणे. सगळेच उत्सुक आहेत. सगळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड आङे. आम्हाला सगळ्यांनाच भारतासाठी खेळायचे आहे. अखेर सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने काम करावे लागेल. जर तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून खेळता तर तुम्ही दबावात आहात. तुम्हाला त्या अपेक्षा एका बाजूला ठेवाव्या लागतील. जर तुम्ही इतक्या अपेक्षांसोबत खेळत आहात तर तुम्ही १०० टक्के स्वत:ला न्याय देऊ शकत नाही.



दुसऱ्या टी-२०मध्ये बुमराहची जादू


पहिल्या सामन्यात दोन विकेट घेत बुमराहने शानदार कमबॅक केले. दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याचा जलवा पाहायला मिळाला. बुमराहने चार ओव्हरमध्ये १५ धावा देत २ विकेट मिळवल्या. बुमराह सध्या फॉर्ममध्ये दिसत आहे. तो आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये भारताचा महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असेल.

Comments
Add Comment

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा