भारताची मालिकेत विजयी आघाडी, दुसऱ्या टी-२०मध्ये आयर्लंडविरुद्ध ३३ धावांनी विजय

डबलिन : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ३३ धावांनी बाजी मारली. य़ा विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८५ धावा केल्या होत्या.


भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ५८ धावांची जबरदस्त खेळी केली. तर संजू सॅमसनने ४० धावांची खेळी केली. रिंकू सिंह यानेही ३८ धावा केल्या. तर शिवम दुबेने २२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या चारही खेळाडूंच्या धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या. आयर्लंडला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान मिळाले.


दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी झाली. यशस्वी जयसवालने ११ बॉलमध्ये १८ धावा केल्या. तिलक वर्मा पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. त्याला केवळ एक धाव करता आली. यानंतर संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसनने २६ बॉलमध्ये ४० धावांची खेळई केली. यातच ऋतुराजने ३९ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले.


दरम्यान, अर्धशतकानंतर तो ५८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शिवम आण रिंकू सिंह संघर्ष करत होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई केली. रिंकू सिंह २१ बॉलमध्ये ३८ धावा करून बाद झाला. शिवम १६ बॉलमध्ये २२ धावा करत नाबाद राहिला.


दुसरीकडे, आयर्लंडने भारताला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. मात्र आयर्लंडला २० षटकांत १५२ धावा करता आल्या. आयर्लंडकडून सलामीवीर अँडी बालबिर्नीने जबरदस्त ७२ धावांची खेळी केली. तर मार्क अडायरने २३ धावांची खेळी केली. बाकी इतर कोणाला चांगली खेळी करता आली नाही.


Comments
Add Comment

The 2026 FIFA World Cup final match : स्लाव्हको विन्सिच यांच्याकडे सोपवली महाअंतिम सामन्याची धुरा

न्यूयॉर्क: फिफा विश्वचषक २०२६ च्या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा करण्यात आली असून,

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.