Nanded crime : धक्कादायक! फळविक्रेत्यावर हसल्यामुळे तरुणाला गमावावे लागले दोन्ही हात

  226

काय झाले नेमके?


नांदेड : रागाच्या भरात हल्ली एखाद्याच्या जीवावर बेतेल इतकी विकृती वाढायला लागली आहे. क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन एखाद्याचा जीव जाईल इतपत हाणामारी होते. नांदेडमधून अशीच एक धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणात एका तरुणाचे हात छाटण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. नांदेडमधील डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात बुधवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. केवळ आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर मोहम्मद तौहीद हा आरोपी फरार आहे. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो तर मोहम्मद तोहीद हा तरुण देखील फळविक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी दोघंही आठवडी बाजार परिसरात विक्री करत होते. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो बाजारात आला. काही क्षणांतच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हात छाटले तसेच पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


घटनेनंतर बाजारात धावपळ उडाली होती. घटनेनंतर जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हात छाटल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशा प्रकारे घटना घडल्याने कोयत्याने हात छाटणारी गँग सक्रिय झाल्याचं दिसून येतं आहे.



गुन्हेगारीत वाढ


मागील काही दिवसांत गुन्हेगारी प्रवृत्तीत इतकी वाढ झाली आहे, की माणसाच्या जीवाची किंमतच उरली नाही, अशी परिस्थिती झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच सायनमध्ये एका महिलेला धक्का लागल्यामुळे तिचा पती व ती आक्रमक झाली आणि त्यांनी धक्का मारलेल्या व्यक्तीला थेट रेल्वे रुळावर ढकलून दिले. तो वर येण्याच्या प्रयत्नात असतानाच ट्रेन आली आणि धडक लागून व्यक्तीचा जीव गेला. इतर अनेक घटनांमध्येही समोरच्या माणसाचा आपल्या हातून जीव गेल्याचा कोणताही पश्चात्ताप आरोपीच्या चेहर्‍यावर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही नक्की कोणत्या पातळीची विकृती आहे, आणि माणसे निष्ठुर बनत चालली आहेत का? अशी चिंताजनक बाब उपस्थित होत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Pratap Sarnaik : इ-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा

ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ- ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात (E-tractor agriculter sector) क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी - एनडी स्टुडिओ मार्फत साकारणार कलाप्रकल्प, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुभारंभ...

मुंबई : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी (Maharashtra Dadasaheb Phalke Cinema) बेळगाव येथील "बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये (Belgaum Smart City)

Municipal school : ठाण्यात फक्त ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम...

ठाणे :  गेला अनेक वर्षांपासून पालिका शाळेत मख्याध्यापकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालिकेतील शाळेत

अजित पवारांच्या मुलापाठोपाठ पुतण्याचाही साखपुडा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला. आता अजित पवारांचा

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून