Nanded crime : धक्कादायक! फळविक्रेत्यावर हसल्यामुळे तरुणाला गमावावे लागले दोन्ही हात

काय झाले नेमके?


नांदेड : रागाच्या भरात हल्ली एखाद्याच्या जीवावर बेतेल इतकी विकृती वाढायला लागली आहे. क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन एखाद्याचा जीव जाईल इतपत हाणामारी होते. नांदेडमधून अशीच एक धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणात एका तरुणाचे हात छाटण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. नांदेडमधील डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात बुधवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. केवळ आपल्यावर हसला म्हणून एका फळ विक्रेत्यानं तरुणाचे दोन्ही हात छाटले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


मोहम्मद अझर मोहम्मद अजीज असं हात गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर मोहम्मद तौहीद हा आरोपी फरार आहे. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो तर मोहम्मद तोहीद हा तरुण देखील फळविक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी दोघंही आठवडी बाजार परिसरात विक्री करत होते. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तो बाजारात आला. काही क्षणांतच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हात छाटले तसेच पायावर आणि पाठीवर कोयत्याने वार करुन जखमी केले. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.


घटनेनंतर बाजारात धावपळ उडाली होती. घटनेनंतर जखमीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हात छाटल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशा प्रकारे घटना घडल्याने कोयत्याने हात छाटणारी गँग सक्रिय झाल्याचं दिसून येतं आहे.



गुन्हेगारीत वाढ


मागील काही दिवसांत गुन्हेगारी प्रवृत्तीत इतकी वाढ झाली आहे, की माणसाच्या जीवाची किंमतच उरली नाही, अशी परिस्थिती झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच सायनमध्ये एका महिलेला धक्का लागल्यामुळे तिचा पती व ती आक्रमक झाली आणि त्यांनी धक्का मारलेल्या व्यक्तीला थेट रेल्वे रुळावर ढकलून दिले. तो वर येण्याच्या प्रयत्नात असतानाच ट्रेन आली आणि धडक लागून व्यक्तीचा जीव गेला. इतर अनेक घटनांमध्येही समोरच्या माणसाचा आपल्या हातून जीव गेल्याचा कोणताही पश्चात्ताप आरोपीच्या चेहर्‍यावर नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही नक्की कोणत्या पातळीची विकृती आहे, आणि माणसे निष्ठुर बनत चालली आहेत का? अशी चिंताजनक बाब उपस्थित होत आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

Kolhapur Student Assault Video : ‘रँगिंग’च्या नावाखाली दहशत! हाॅस्टेलमध्ये सर्रास 'रॅगिंग' की टोळीयुद्ध? तळसंदे पाठोपाठ पेठवडगावमध्येही विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष

'हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही': उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा

३२ हजार कोटींच्या मदतीने विरोधकांचे राजकारण हाणून पाडले; 'मुंबई मनपासाठी थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा' छत्रपती

Fake Currency: अरे बापरे! पोलिसानेच काढला होता बनावट नोटांचा कारखाना; असा केला पर्दाफाश!

'सिद्धकला चहा'मधून १ कोटींच्या बनावट नोटा जप्त; पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केला मोठा खुलासा मिरज (सांगली):

भारताचा इतिहास पराभवाचा नव्हे संघर्षाचा”- सरसंघचालक

नागपूर : भारतावर अनादी काळापासून सातत्याने हल्ले होत राहिले. परंतु, कुठलाही परकीय आक्रांता एक रात्र देखील

जिथे शक्य तिथे महायुती म्हणजे काय? महायुतीमध्ये नेमकं काय घडतंय? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...

नाशिक : पुढील काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका)