IND vs IRE: बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रचला इतिहास

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध (west indies) टी-२० मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया (team india) आयर्लंड दौऱ्यावर आहे. भारत(india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.या सामन्यात भारताचे नेतृत्व टीम इंडियाचा युवा खेळाडू जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) करत आहे. बुमराहने तब्बल वर्षभरानंतर मैदानावर पुनरागमन केले आहे.



बुमराहने रचला इतिहास


आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात उतरताच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. तो टी-२०चा पहिला गोलंदाज कर्णधार आहे. आतापर्यंत टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व फलंदाजांनी केले आहे.



केवळ तीन खेळाडूंनी केले ५०हून अधिक सामन्यात नेतृत्व


जसप्रीत बुमराह हा टी-२०चा ११वा कर्णधार आहे. याआधी टी-२० संघाचे नेतृत्व कऱणाऱ्या कर्णधारांच्या यादीवर नजर टाकली असता केवळ तीनच असे खेळाडू आहेत ज्यांनी ५०हून अधिक सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक ७२ सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.


त्याच्या नेतृत्वात भारताने ४१ सामने जिंकले आहेत तर २८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णीत राहिला. धोनीच्या विजयाची टक्केवारी ६० टक्के आहे. तर दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने ५१ सामन्यात नेतृत्व केले आहे. याशिवाय तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने ५० सामन्यांत नेतृत्व केले आहे.



यांनी केलेय भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व


जसप्रीत बुमराहआधी भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व १० खेळाडूंनी केले आहे. वीरेंद्र सेहवाग पहिला कर्णधार आहे. यानंतर एमएस धोनी, सुरेश रैना,अजिंक्य रहाणे, विराट कोहली, शिखर धवन, ऋषभ पंत, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी नेतृत्व केले आहे.


Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : भारतीय वंशाच्या खेळाडूंचा दबदबा; निशान वेलूपिल्लईच्या प्रवेशाने पुन्हा चर्चांना उधाण

फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ सध्या जगभरात सुरू आहे. युरोप आणि आफ्रिकेतील संघांची धडाकेबाज कामगिरी पाहून

Nashik : अभिमानास्पद ! नाशिकच्या भाविका अहिरेकडे भारताच्या अंडर-19 महिला संघाचे नेतृत्व; श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधारपदाची मोठी जबाबदारी

Nashik : नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. सटाणा तालुक्यातील लखमापूर गावची कन्या भाविका अहिरे हिची

Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीचे करिअर संकटात ? भारतीय संघात पदार्पण करण्याआधीच बॅनची शक्यता

मुंबई : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिरंगी मालिकेतील सामन्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी वादाच्या

Vaibhav Sooryvanshi : आयपीएलमध्ये षटकारांचा वर्षाव, पण वनडेत संघर्ष! नेमकं वैभवसमोर आव्हान काय ?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये बेबी बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारत अ संघात संधी देण्यात आली होती.

Indian Womens Hockey Team :भारतीय महिला हॉकी संघाचा विजय, जपानला हरवल्यामुळे उपांत्य फेरीचा प्रवेश झाला सोपा

मुंबई: भारतीय हॉकी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवार, १६ जून रोजी ऑकलंडमधील नॉर्थ

ED Notice : खोटी बातमी पसरवणाऱ्यांविरुद्ध सौरव गांगुली आक्रमक; कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याबाबत सोशल मीडियावर एक