Asia Cup 2023: कधी मिळणार भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट, जाणून घ्या

मुंबई: आशिया कप २०२३ची सुरूवात येत्या ३० ऑगस्टपासून होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात रंगणार आहे. यावेळेस आशिया कपचे आयोजन हायब्रिड मॉडेलप्रमाणे होत आहे. या स्पर्धेतील ९ सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. तर ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत.


श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीट विक्री गुरूवार म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणाऱ्या सामन्याचे तिकीट गुरूवारी खरेदी करू शकतात. हा सामना पल्लेकल येथे खेळवला जाणार आहे.



आजपासून तिकीट विक्री


खरंतर, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलीजद्वारे तिकीट विक्रीची माहिती दिली. पीसीबीने सांगितले की श्रीलंकेत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांची तिकीटे १७ ऑगस्टला १२.३०वाजल्यापासून खरेदी करता येतील. तिकीट विक्रीचा दुसरा टप्पा संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना खेळवला जाईल. या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट आज चाहत्यांना मिळणार आहे. हे दोन्ही संघ पल्लेकलमध्ये आमनेसामने असतील.


इंडिया टुडेच्या बातमीनुसार चाहत्यांना तिकीट खरेदी करण्यासाठी पासपोर्ट अथवा ओळखपत्राची गरज असेल. या दोन्हींपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे गरजेचे आहे. एका ओळखपत्रावर तुम्हाला केवळ चार तिकीटे खरेदी करता येऊ शकतात. तर एका ओळखपत्राने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे केवळ दोन तिकीटे तुम्हाला मिळू शकतात. प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने याची तिकीटे खरेदी करू शकतात. यासाठी त्यांना पीसीबीच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.


आशिया कप २०२३चा पहिला सामना मुल्तानमध्ये खेळवला जाईल. यानंतर ३ सप्टेंबरला बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात लाहोरमध्ये खेळवला जाईल. लाहोरमध्ये ५ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला सामने आयोजित केले जातील. याशिवाय बाकी ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा शेवटचा सामना १७ सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार आहे.

Comments
Add Comment

Sachin Siwach : राष्ट्रकुल खेळ २०२६: भारतीय बॉक्सर सचिन सिवाच 'राऊंड ऑफ १६' मध्ये

ग्लासगो : भारताचा स्टार बॉक्सर सचिन सिवाचने शनिवारी पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या 'राऊंड ऑफ १६' मध्ये प्रवेश

Common Wealth Games 2026 : पुन्हा डोपिंग प्रकरण, दहा दिवसांत चौथी घटना; भारताला बसला मोठा फटका

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ साठी भारताने १२६ जणांच्या संघाची घोषणा केली. पण भारताच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र

IND VS ZIM : हरारेमध्ये ईशान किशनचे वादळ, झिम्बाब्वेसमोर २२० धावांचं लक्ष्य

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे सुरू आहे. या

Ind VS Zim : झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत दिला भारताला दुहेरी धक्का ! अभिषेक आणि वैभव पॉवर प्ले संपण्यापूर्वी बाद

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळवला जात आहे. या

Abhishek vs Vaibhav In T20 : अभिषेक की वैभव टी-२० चा खरा बादशाह कोण? आकडेवारी काय सांगते, जाणून घेऊया

मुंबई : अभिषेक आणि वैभव या दोघांपैकी टी-२० मध्ये सर्वात स्फोटक फलंदाज कोण? याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात

Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींकडून पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन

नवी दिल्ली : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह